Weather Update | राज्यात पावसाने आपला रौद्ररूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. परंतु मराठवाड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे अशातच पुन्हा एकदा जोरदार सरींनी सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेला आहे तर हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी काही महत्त्वाचा इशारा वर्तवलेला आहे. हवामान खात्याकडून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर वादळी पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन व्यवस्थापना केंद्राकडून थेट ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आलेला आहे Weather Update
रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धोका!
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, घाटमात्यांवरती अवकाळी पावसाच्या सतत धारेमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, तर डोंगर उतारांवर दरड कोसळण्याची घटना देखील वाढलेली आहे. पुणे सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यांवर जसे की तामिनी, आंबेनळी, आंबा घाट, खेड येथे जोरदार पावसाचा धोका असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग मध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.
राज्यातील कालच्या पावसाचा तडाका – मुंबई, ठाणे रायगडात पावसाची मुसळधार
17 जून 2025 रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसात मुंबई उपनगरात 83 मिमी, ठाणे जिल्ह्यामध्ये 73 मिमी, रायगड जिल्ह्यामध्ये 54 मिमी, पालघर मध्ये 49 मिमी तर रत्नागिरीमध्ये 47 मी मी पावसाची नोंद झाली. नाशिक जळगाव कोल्हापूर सातारा धुळे या भागांमध्ये हलकासा पाऊस झाला आहे. परंतु कोकण व घाटमाता परिसरात पावसाचा जोरा अधिक असल्याचं हवामान विभागाचे म्हणणं आहे.
पावसाच्या ताज्या घडामोडी!
हा पाऊस नुसता शेतकऱ्यांसाठीच पोषक नसतो तर सर्वांचं जीवनमान या पावसावरती अवलंबून आहे. परंतु हा पाऊस जेवढा आपल्याला उपयोगी आहे तेवढा धोकादाय देखील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वंजाळ वडी येथे मुंबई गोवा महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या असून वाहतूक एका मार्गाने सुरू आहे. साताऱ्यात पाटण चिपळूण महामार्गाचा पर्यायी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती, पंचगंगा आणि कुंबी नदीच्या पातळ्या वाढत असून नदीकाठच्या गावांना आदर्श देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 ft 10 in वर पोहोचली असून सात बंधारे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीत 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुणबी धरणातून सुद्धा 300 क्युसिक पाणी सोडण्यात येत आहे यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.