Weather Update : राज्यामध्ये एकीकडे उष्णतेचे लाट तापमानाचा पारा वाढत असतानाच, एक मोठा हवामान अंदाज समोर आलेला आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होत असताना शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. द्रोनिकेच्या प्रभावामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे. येत्या काही दिवसात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.Weather Update
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, सध्या उडीसा ते पश्चिम बंगाल दरम्यान एक उत्तर दक्षिण दिशेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे राज्यातील वातावरण अस्थिर बनल्या असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. याशिवाय मध्यम छत्तीसगड ते म्यानरचा आख्यात या दरम्यान दुसरी द्रोणी का सक्रिय आहे, जी विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक व तमिळनाडू वर प्रभाव टाकते.
भारतीय विभागाने आज पंचवीस एप्रिल रोजी, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हिटवेचा इशारा दिलेला आहे. ताशी वाऱ्यांची तीव्रता वाढू शकते आणि तापमान 42 अंश सेल्सिअस आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
तर 26 एप्रिल रोजी म्हणजे उद्या सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करावे.
27 व 28 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सांगली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे, गारपिटचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
या अवकाळी हवामानामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. विशेषता, हरभरा, गहू, मका, फळबाग, आणि भाजीपाल्यांना यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य ते नियोजन करावे. आणि हवामान अपडेट कडे लक्ष ठेवावे.
ज्याला काही दिवसांपासून राज्याचे हवामानामध्ये सतत बदल होत आहे, अवकाळी पावसावर गारपिटीने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा केले आहे. हित्वेवमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच, पावसामुळे शेतीचाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हवामान खात्याचा इशाराकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
(हवामान व शेती अपडेट साठी आमच्या पोर्टलला दररोज भेट देत रहा)
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज
1 thought on “Weather Update : राज्यातील या नऊ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाचा नवीन अंदाज पाहिला का?”