Weather update : महाराष्ट्रावर पुन्हा एक मोठे संकट; या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा नवीन अंदाज

Weather update : भारतीय हवामान खात्याच्या नवीन ताज्या हवामान अंदाजानुसार, राज्यात एक मोठे संकट वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी देखील विशेष काळजी घेण्याचा आव्हान करण्यात येत आहेत. भारतीय हवामान खात्याचे या नवीन अंदाजामध्ये काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या बातमीब मध्ये करणार आहोत. Weather update

भारतीय हवामान खात्याने तीन एप्रिल मध्ये आज महाराष्ट्राच्या हवामानामध्ये बदल झाले असल्याचे म्हटले आहे. राज्यांमध्ये काही भागात वादळी वारा सह गारपिटचा व मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिला ते खालील प्रमाणे वाचा.

या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने 3 एप्रिल 2025 मध्ये आज महाराष्ट्राचे हवामानामध्ये बदल झाले असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमी वरती राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमी वरती मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज ॲलर्ट दिलेला आहे. या पार्श्वभूमी वरती राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, जालना, बीड या ठिकाणी पावसाचा इशारा राहिलेला आहे. त्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने गारपिट होण्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याच्या आव्हान देखील करण्यात आलेले आहे.

भारतीय हवामान खात्याने पुण्यामध्ये कमाल तापमान 35°c तर किमान 20°c राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमी वरती जिल्ह्यामध्ये दुपारनंतर गारपिट व वादळीवाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. तर नागपूर मध्ये देखील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

तर याच पार्श्वभूमीवरती सातारा आणि जालना यासारख्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये वादळीवारा सह गारपीट पडण्याचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातिल शेतकऱ्याने तीन एप्रिल रोजी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.

खरे तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अचानक आलेला अवकाळी पावसाने बागायती शेतीसह रब्बी हंगामातील पिकांची देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलेले आहे.

राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याने गरजेचे आहे. तसेच नवनवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हवामान अंदाज मिळेल आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या लेखाचा फायदा होईल.

हे पण वाचा | Weather Update | पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Leave a Comment

error: Content is protected !!