Weather Update | पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Update | अशातच राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ( Farmers need to be cautious as heavy rains are expected in many districts of the state. This weather forecast by the India Meteorological Department is very important for farmers. ) Weather Update

या जिल्ह्यांना इशारा

भारतीय हवामान खात्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात दोन एप्रिलला मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे देखील सांगितले जात आहे. नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, जालना, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

तसेच कोकण व खानदेश मधील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमी वरती जळगाव, नंदुरबार, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना देखील हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिलेला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, भंडारा, अकोला, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे व भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करा.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवरती पाहायला मिळत आहे. मध्यंतरी उष्णतेने मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना हैराण झाले होते. तर आता राज्याच्या हवामानामध्ये अचानक बदल झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. या अवकाळी पावसाच वातावरणाने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण केलेले आहे. शेतकऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान खात्याने इशारा दिल्याने शेतकरी बांधवांनी वेळोवेळी हवामान अपडेट चेक करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना हवामानाबद्दल लवकरात लवकर माहिती मिळेल आणि योग्य माहिती व लवकरात अपडेट हवी असेल तर आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात माहिती देण्याचा प्रयत्न करू.

3 thoughts on “Weather Update | पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट”

Leave a Comment

error: Content is protected !!