Weather Alert | राज्यातील या नऊ जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो थोड सावध राहा!

Weather Alert : चला तर पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काल बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. परंतु या काळात पावसाची तीव्रता अधिक वाढणार आहे आणि वाऱ्यांची गती देखील असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. काल बीडमध्ये सायंकाळी तीनच्या नंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या ठिकाणी अनेक मोठे नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी लाईटचे पोल पडले तर काही ठिकाणी झाडे पडले आहेत. त्यामध्ये अद्याप कुठलीही जीव थानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. Weather Alert

हे पण वाचा | Weather Alert | महाराष्ट्रात पुढील 48 तासात होणार धो धो पाऊस, हा हवामान अंदाज लक्षात घ्या

याच पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने पुन्हा एकदा नवीन इशारा दिलेला आहे यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आवाहन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या हवामान अंदाजामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कोणताही हवामानाचा अंदाज न बघता घराबाहेर पडू नये असंच म्हणावे लागेल.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे लोकल सेवा आणि ट्राफिक तसेच विजांच्या समस्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरवात ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात पावसाची सरासरी शक्यता असल्याने तिथे राहणाऱ्यांची घरांची गळती, शेतातील कापनि, खतांची मांडणी हे सर्व वेळेवर पार पडावं.

हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना विशेष अलर्ट दिलेला आहे. तर या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतातील पीक झाकाव आणि गरज असल्यास तातडीची उपयोजना करावी. तर पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये देखील तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सोलापुरात गेल्या काही वर्षात अशा अवकाळी पावसाचा मोठा नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा पूर्वी तयारीला सुरुवात केली जात आहे.

मराठवाड्याचा विचार केला तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर जालना, संभाजीनगर, आणि बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांचा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट जारी झाला असून , नागरिकांनी आवश्यक प्रवास टाळावा, घरांच्या खिडक्या, झाड, विजांच्या वायरिंग संबंधित उपाययोजना करावेत.

हवामान खात्याने विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व गावातील लोकांनी व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनाचे पालन करणे आवश्यक आहे. उर्वर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पिकांवर, बांधांवर, जनावरांवर परिणाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहाव.

error: Content is protected !!