Unseasonal rain in Maharashtra : सध्या राज्यात उष्णतेचे तीव्रता वाढली असताना हवामानाने नव स्वरूप घेतला आहे. उन्हाने आधीच माणसं बेचैन झाले असताना आता गारपीटीच संकट डोक्यावर आला आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाने काही ठिकाणी गारपीडीचा धोका निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे भारतीय हवामान खात्याच्या या अंदाजानं मध्ये कोणत्या जिल्ह्यांना विशेष इशारा दिला आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Unseasonal rain in Maharashtra
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, पाच ते सात मे दरम्यान उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये सहा आणि सात मे रोजी भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तर पाच मे रोजी अवकाळी वारे आणि गारपीट सह जोरदार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे. अमरावती यवतमाळ अकोला चंद्रपूर सारख्या या भागात पावसाचे वातावरण आहे.
उन्हाळ्यात जिओचे पिकाची काढणी चालू असताना, राज्याच्या वातावरणात मोठा बदल झालेला आहे. त्या बदलाच्या पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने गारपिटल इशारा दिला आहे म्हणजे थेट नुकसान शेतकऱ्यांना होणार आहे. कांदा मिरची भुईमूग भाजीपाला आंबा केळ यासारखे पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊ शकते. अनेक बागा शेतकरी आता पेरणीपूर्वी मशागतीला सुरुवात करणारच होते पण हवामानात पुन्हा बदल झाल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.
उन्हाळा जसा तापत चाललाय, तसंच आकाश अंगावर येत आहे. एकीकडे आंब्याची गोडी वाढते, तर दुसरीकडे त्याच्या झाडांवर गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्यांन वाजवलेली ही घंटा हलक्यात घेऊ नका, थोडं सजग राहिला तर नुकसान टळेल.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो तयारीला लागा! मान्सून लवकर येणार! या तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल वाचा सविस्तर
2 thoughts on “महाराष्ट्रावरती अवकाळीच मोठा संकट! हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला विशेष इशारा”