Today horoscope | सगळं थांबलेलं होतं… जणू काळच थांबला होता. आयुष्यात एकामागोमाग एक संकटं, डोक्यावर जबाबदाऱ्या, खिशात पैसे नाहीत आणि मनात शांतता नाही. पण आता ही सगळी अंधाराची वेळ संपली आहे. कारण १७ जूनपासून काही राशीच्या लोकांच्या जीवनात नव्याने सूर्य उगमणार आहे. बुध ग्रहाने नक्षत्र बदललंय, आणि त्याचा थेट परिणाम या निवडक राशींच्या नशिबावर होणार आहे. हा काळ खरंच सोन्यासारखा असणार आहे.Today horoscope
बुध ग्रहाचा नवा खेळ… आणि काहींचं नशीब फुलणार
बुध ग्रह ज्याला ज्योतिषशास्त्रात वाणी, बुद्धी, व्यापार यांचा कारक मानतात त्याने १६ जूनला पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे. आणि त्याचा प्रभाव १७ जूनपासून पडू लागला आहे. बुध राजकुमारासारखा ग्रह आहे ज्याच्या कृपेनं आयुष्य बदलतं, कामं सुरू होतात, शब्दांना वजन येतं, आणि तुमच्या विचारांचं सोनं होतं.
या राशींना लाभणार वारेमाप यश
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी तर या बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा जबरदस्त फायदा होणार आहे. मागचे काही महिने ज्यांनी संघर्षात घालवले, त्यांच्या पाठीवर आता सुखाचा हात पडणार आहे. नोकरीत योग्य कामगिरी केल्यास वरच्या पदावर जाण्याची शक्यता आहे. शिक्षण घेणाऱ्या मुलांना परीक्षेत यश मिळेल, आणि ज्यांचं आत्मविश्वास गडगडलं होतं त्यांना परत उभं राहण्याची ताकद मिळेल. एवढंच नाही तर अचानक पैसा मिळण्याचे योगही आहेत कुठल्या लॉटरीसारखा नाही, तर तुमच्या मेहनतीचं फळ म्हणून.
सिंह : सिंह राशीच्या लोकांचं मागचं बरंचसं आयुष्य अडकलेलं होतं. काहींची नोकरी टिकली नव्हती, तर काहींचं घरात सुद्धा वातावरण ठीक नव्हतं. पण आता या राशीच्या लोकांच्या जीवनात सौख्य, पैसा आणि समाधान यांचा एकत्रित वर्षाव होणार आहे. जुनी अडकलेली कामं मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. घरात सुद्धा हसणं ऐकू येईल. नात्यात प्रेमाचं बंधन घट्ट होईल आणि करिअरमध्ये चांगले बदल दिसून येतील. या राशीच्या लोकांनी आता पुढे जाण्याचं ठरवलं पाहिजे कारण काळ त्यांच्याच बाजूने आहे.
हे पण वाचा | Rashi Bhavishya: या तीन राशींचे भाग्य उजळणार! तयार झाला मोठा राज योग, कोणत्या आहे या राशी
मेष : बुध ग्रहाच्या या परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांना देखील जबरदस्त सकारात्मक परिणाम मिळणार आहे. बोलण्यात वजन येईल, लोक ऐकतील, तुमचे निर्णय मान्य होतील. समाजात तुमचा मान वाढेल. मित्रमंडळींबरोबर वेळ घालवायला मिळेल. कुटुंबात हसरा चेहरा दिसेल. मुलांनाही यश मिळेल. आणि ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य हवं होतं, त्यांना आता त्याचा शोध लागेल. या काळात तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल आणि ते शिकणं भविष्यात फायद्याचं ठरेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे आम्ही अंधश्रद्धे बाबत कुठलाही दुजारा देत नाही)