Tar Kumpan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे जर तुम्हाला देखील शेताला तार कुंपण करायचे असेल तर शासनाच्या माध्यमातून 90% अनुदान देण्यात येत आहे. यासाठी तुम्ही कशा पकारे अर्ज करू शकता. तुम्हाला अनुदान कसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. Tar Kumpan Yojana
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक लोकप्रिय योजना राबवते त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होतो. खरंतर शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ सदृश्य परिस्थिती यासह वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही देखील मोठी समस्या आहे. हरणे, रान डुकरे, माकडे आणि नीलगाय यासारखे प्राणी शेतामध्ये घुसून उभे पिक उध्वस्त करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान होत आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नवीन योजना राबवली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या लोकप्रिय योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. कृषी विभागामार्फत या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांचे पिकांचे संरक्षण करण्यास मदत करणे आणि वन प्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखणे हा आहे. ही योजना राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे यामुळे पिकांचे संरक्षण होते उत्पादन वाढते आणि शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. .
Tar Kumpan Yojana साठी आवश्यक अटी
- शेतजमिनीवर कोणते अतिक्रमण नसावे.
- वन प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात असलेल्या जमिनींना लाभ मिळणार नाही.
- ग्राम परिस्थितीत विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमती अनिवार्य आहे तसेच या योजनेसाठी दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 लोखंडी खांब मिळणार आहेत.
तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा आणि गाव नमुना 8
- शेतकऱ्यांच्या आधार कार्ड
- ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला
- शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास संमती पत्र
- वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
असा करा अर्ज
- अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागद तयार असणे आवश्यक आहे.
- तुमच्या गावातील पंचायत समितीकडे जा.
- संवर्ग विकास अधिकारी किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करा.
- तपासण्या आणि मंजुरीनंतर लाभ मिळणार आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
- किंवा अर्ज करण्याचा अडथळा येत असेल CSC केंद्रावर जाऊन चौकशी करा.
या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, फळबाग धान्य भाजीपाला आणि ऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी विविध शेतकरी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. तुम्ही देखील या योजनेचा अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा होईल.
हे पण वाचा | राज्य सरकारच्या पाईपलाईन योजनेला अर्ज सुरू! या शेतकऱ्यांना करता येणारा अर्ज, पहा पूर्ण अर्ज प्रक्रिया