12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा

SSC HSC EXAM : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या दहावी ( SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलने त्यावर्षी दहावीची परीक्षा साठी 19000 आणि बारावीच्या परीक्षेसाठी तब्बल 17000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. SSC HSC EXAM

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत असून दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येतील या वाढीमुळे परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.

मुंबई विभागातील वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबई विभागातील 3,58,854 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 1,87,362 पुरुष तर 1,71,490 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे. 2024 मध्ये अनुक्रमे 1,74,921 पुरुष आणि 1,66,263 महिला उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती. बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी 3,38,478 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून, 2024 मध्ये ही संख्या 3,21,116 होती.

हे पण वाचा | दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपची सत्ता; AAP चा दारुण पराभव!

शाखेनुसार विद्यार्थ्यांची संख्या

विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या विविध शाखांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

  • कला शाखेत: 2024 मध्ये 40,756 विद्यार्थी होते, तर यंदा 45 हजार 415 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
  • वाणिज्य शाखेत : यंदा एक लाख 63 हजार 965 विद्यार्थी परीक्षा देणार असून, गेल्या वर्षीची संख्या एक लाख 58 हजार 965 होती. म्हणजे सुमारे 5000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे.
  • विज्ञान शाखेत: 2024 मध्ये एक लाख 17 हजार 566 विद्यार्थी होते तर यंदा एक लाख 25 हजार 240 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षा व्यवस्थापनात सुधारणा

विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे परीक्षा नियोजन आणि लॉजिस्टिक मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात आलेले आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढ हा सकारात्मक संकेत आहे. यामुळे शिक्षणाबद्दल जागता वाढत आहे. परीक्षा केंद्रावर अतिरिक्त व्यवस्थापन कर्मचारी, कडक सुरक्षा आणि उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी सूचना

बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर वेळ सुरू होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी उपस्थित राहावे. परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच, परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार टाळण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाचे

बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने यंदा शैक्षणिक वर्ष अधिक स्पर्धात्मक ठरणार आहे. ही वाढ शिक्षणाकडे वाढती जागता आणि पालक व विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना आमच्या टीमचे वतीने शुभेच्छा!

error: Content is protected !!