Solapur Unseasonal Rain | सध्या अवकाळी पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातला आहे अनेक ठिकाणी कुठे मुसळधार पाऊस बसत असल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काय करावे हे सुचत नाही. अचानक आलेला पावसाने धावपळ होत आहे. अशात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. पावसामुळे एका आजीबाईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Solapur Unseasonal Rain
महाराष्ट्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आजीबाईंनी जनावराच्या गोठ्यामध्ये आसरा घेतला होता. परंतु आकाशात पडत असलेला पाऊस आणि वाऱ्यांचा वेग वाढत असल्याने पावसाचे थेंब जमिनीवर आपटत होते. पण वाऱ्याशी पावसाची झुंजत तानाबाई गायकवाड हे आपल्या छत्रसावली खाली उभ्या असलेल्या जनावरांना गोठ्यात सोडून कुठेही गेल्या नाहीत. त्यांच्यासमोर डोळेत गोट्यातील जनावरे होती जणू आपलीच लेकर. पण काळाच्या खुर खेळात काही क्षणांनी सगळं संपलं. तनुबाई गायकवाड या वयाच्या 60 नंतर ही आपल्या शेतातील साऱ्या जवाबदाऱ्या पार पडत होत्या.
मात्र सायंकाळची वेळ होती. अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. गावातील लोकांनी कसलंही एक थोडाफार आसरा घ्यायला सुरुवात केली. पण तानूबाई मात्र आपल्या गोठ्यात होत्या – एकटक जनावराकडे पाहत होत्या. त्या दावत कुणाकडे गेला नाहीत, उलट त्यांनी गोट्यातील एका वासराला जवळ घेतलं होतं पण काही क्षणातच गोट्याचा एक भाग वाऱ्यांच्या वेगाने कोसळला आणि त्या ढिगाराखाली अडकल्या.
रात्री उशिरा जेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी काळजी करत शेत गाठलं, तेव्हा समोरच दृश्य पाहून छाती फाटली. चिखलाने माखलेल्या अंग, तोंडावर आलेली थोडीशी माती आणि अर्धवट सुटलेला पदर त्यात कानुबाई जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना सापडल्या. त्यांच्या नातवाने आणि मुलाने मिळून ढिगारा दूर करत त्यांना बाहेर काढलं. एक क्षण असा होता की अजून काही श्वास शिल्लक असेल, पण मोहोळच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केलं. गावात कुणी बोललो नाही, फक्त हुंडके ऐकू येत होते.
तनुबाईच्या जाण्याने संपूर्ण शिरापूर गावात शोक काळा पसरली. सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर शेकडो लोकांच्या रांगा लागल्या आहेत. “हि बाई म्हणजे गावाची माया होती हो… जनावरासाठी जीव द्यायची!”असं म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रू थांबेनासे झालेत. एकीकडे गावातील माणसे आभाळाकडे बघून शोक व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे त्या गोठ्यात अजूनही एक जुनी घंटा झूलत आहे . तिचा आवाज आता ताणूबाई सोबतच हरवला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेले समोर आलेले आहे. राज्यभर मे महिन्यात झालेला अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कोटीवधीचा नुकसान केलं.
हवामान विभागांनी पुढील धोकाय व्यक्त केला आहे. आज पंचवीस मे रोजी रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अति मुसलदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अधिक सावध राहणं अत्यंत गरजेचे आहे.
हे पण वाचा | राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
1 thought on “Solapur Unseasonal Rain | सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान! अनेक ठिकाणी मोठे नुकसान! तर एकाचा मृत्यू”