Satbara Utara: राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक बातमी समोर येत आहे. येत्या एक ऑक्टोबर 2025 पासून जमिनीशी संबंधित अत्यंत आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता सातबारा उतारा, आठ अ उतारा, फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड यासारख्या महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला थेट तुमच्या मोबाईल वरती व्हाट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या नवीन नियमामुळे केवळ कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार नाही तर त्यासोबत पारदर्शकता सुरक्षित आणि आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर बनणार आहे.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जमिनीची कागदपत्रे काढण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ व्यर्थ जात होता. शेतकऱ्यांना शेतू केंद्र महा-ई-सेवा केंद्र किंवा खाजगी एजंट यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे एजंट कडून होणाऱ्या फसवणुकीच्या समस्या निर्माण होत होत्या. काही वेळा कागदपत्रांची प्रत पेन ड्राईव्ह किंवा इतर अविश्वासनीय माध्यमातून दिले जात असे ज्यामुळे त्या कागदपत्राचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढत असे. मात्र आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर जमिनीची कागदपत्रे पाहता येणार आहेत.
हे पण वाचा|26 जूननंतर या जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस! जाणून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…
आता सरकारने या सर्व समस्या वर कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यात आला आहे. एक ऑक्टोबर 2025 पासून लागू होणारी नवीन सेवा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असेल याचा अर्थ असा की तुम्हाला आता कोणत्याही एजंट कडे जाण्याची किंवा रांगेत उभा राहण्याची गरज भासणार नाही. तुमचा वेळ पैसा आणि श्रमाची मोठी बचत देखील होणार आहे. तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नवीन नियमानुसार हा सर्व व्यवहार थेट सरकारी प्रणालीतून केला जाणार आहे. Satbara Utara
हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांच्या अडचणीवर मिळणार तात्काळ उपाय, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार..
Whatsapp सेवेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?
सरकारच्या या नवीन सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
- यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला राज्याच्या अधिकृत भूमी अभिलेख पोर्टलवर जाऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल.
- नोंदणी करताना तुम्हाला आपली मालकी जमीन असल्याचा पुरावा म्हणून जुना सातबारा उतारा खाते क्रमांक किंवा मिळकत क्रमांक यापैकी कोणत्याही एक माहिती देणे आवश्यक आहे.
- तुमचा मोबाईल नंबर ओटीपी द्वारे पडताळला जाईल. ज्यामुळे तुमची नोंदणी सुरक्षित आणि अधिकृत पद्धतीने होईल.
- नोंदणीसाठी केवळ एकदाच 50 रुपयाची शुल्क आकारले जाणार आहेत यानंतर प्रत्येक कागदपत्रे मिळवण्यासाठी फक्त पंधरा रुपये आकारले जातील. हे शुल्कपूर्वी खाजगी एजंट घेत असलेल्या शुल्का पेक्षा कितीतरी कमी आहेत.
- एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला whatsapp वरून थेट डिजिटल सातबारा सेवा मिळवता येईल.
हे पण वाचा|महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…
व्हाट्सअप सेवेचे फायदे
या नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमुख तीन प्रकारच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनी संबंधित कागदपत्रे फेरफार प्रक्रियेची माहिती आणि दस्तावेजांच्या वापराबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीबद्दल अधिक अचूक माहिती उपलब्ध मिळेल.
- ही सेवा सर्वात महत्त्वाची आहे यातून शेतकरी आणि नागरिक सातबारा आठ अ फेरफार नोंदी आणि रेकॉर्ड यासारख्या डिजिटल उतारे थेट whatsapp वरून मिळू शकतील. हे उतारे कायदेशीर दृष्ट्या वैद्य असतील आणि त्यांच्यावर सरकारी शिक्का मोर्तब केलेला असेल.
- तुमच्या जमिनीच्या नोंदीत काही बदल झाल्यास जसे की खरेदी विक्री फेरफार किंवा नावामध्ये बदल याची थेट माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. यामुळे फसवणुकीची शक्यता खूप कमी होईल आणि तुमच्या मालकीची हक्काची माहिती तुम्हाला मिळेल. जमिनीच्या नोंदीमध्ये आणि विकृत बदल झाल्यास तुम्हाला त्वरित त्याची कल्पना होईल यामुळे तुम्ही योग्य वेळेत योग्य ते कारवाई करू शकाल.