RBI आणतये 20 रुपयांची नवी नोट! पण जुन्या नोटांचं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

RBI new twenty rupee note : शहरातील लोकांसारखंच गावातल्या मंडळींचंही बँक पैसे, चलन आणि नोटांवर सतत नजर असते. एखादी नवीन नोट आली की, बाजारात चर्चा सुरू होते “ही खरी का बनावट?” “जुनी चालेल का?” असं विचारलं जातं. अशाच घडामोडीत रिझर्व बँक ऑफ इंडिया एक नवीन घोषणा केली. लवकरच २० रुपयांची नवीन नोट बाजारात येणार आहे. शनिवारी यासंदर्भात आरबीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आली आणि देशभरात याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या सहीने  ही नवीन नोट जरी होणार असून, ती महात्मा गांधीच्या नव्या सिरीज मध्ये सादर केली जाईल. म्हणजे जुन्या डिझाईन वर आधारित असलेली. पण त्यामध्ये काही सुधारणा आणि सुरक्षा बदल असतील. RBI new twenty rupee note

जुन्या नोटा बंद होणार का? हा पहिला प्रश्न लोकांच्या मनात आला. पण आरबीआय ताबडतोब स्पष्ट केले की जुन्या नोटा तशाच चालू राहणार आहेत. म्हणजे ज्या 20 च्या रुपयांच्या नोटा सध्या तुमच्याकडे आहेत, त्या कुठेही घेऊन जाण्याची, बदलण्याची गरज नाही. त्या तशाच बाजारात, दुकानदाराकडे, एटीएम मधून चालू राहतील. नवीन नोटा फक्त त्या नोटांच्या शेजारी येऊन उभ्या राहणार आहेत. चालू असलेल्या चलनात आणखी एक पर्याय वाढवण्यात येईल इतकच.

नव्या नोटांमध्ये काय वेगळ असेल, हे पाहायचं झालं, तर त्यामध्ये महात्मा गांधीचे चित्र अधिक स्पष्ट आणि ठसठशीत असेल, वॉटर मार्क अधिक सुरक्षित असेल, आणि नंबरिंग पॅटर्न मध्ये बारीक बारीक बदल करून बनावट नोटा ओळखता याव्यात याची दक्षता घेतली असेल. सुरक्षेच्या दृष्टीने या मध्ये नवीन धागे, छपाईत आधुनिक पद्धतीचा वापर आणि रंगसंगतीत ही थोडा बदल असण्याची शक्यता वर्तवली जाते. आरबीआय वेळोवेळी अशा नोटा फक्त बदलाच्या उद्देशाने नव्हे, तर चलनात स्थिरता आणण्यासाठी, बनावट नोटांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणत असते.

गावाकडे एकदा माणूस बाजारात एकदा वेगळी दिसणारी नोट दिसली, समोरचा दुकानदारी बघून शंका घेतो.”ही खरीच आहे ना?” म्हणून पुन्हा विचारतो. अशावेळी चलनातील प्रत्येक बदलाचा योग्य माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे फार गरजेचं असतं. याच पार्श्वभूमी वरती रिझर्व बँकेने स्पष्ट केलं की कोणालाही जुन्या नोटा बदलायची गरज नाही, त्या बँकेत नेऊन भरावे लागत नाहीत, त्या बंद होणार नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरू नये. नव्या नोटा केवल चलनातील विविधता वाढवण्यासाठी येत आहेत, जुन्यांना हटवण्यासाठी नाहीत.

हे सगळं का केलं जातं? यामागे मुख्य उद्देश एकच भारतीय चलन अधिक सुरक्षित करणे. सध्या बनावट नोटांचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवीन गव्हर्नर नियुक्त होतो, किंवा तांत्रिक सुधारण्या करायच्या असतात, तेव्हा आली बाई नव्या नोटा जरी करतो. हे केवळ डिझायनर्स नव्हे तर सुरक्षिततेचे आणि देशाच्या आर्थिक स्वच्छतेचे पाऊल आहे.

जर तुमच्याकडे सध्या २० रुपयांच्या जुन्या नोटा असतील, तर चिंता करू नका. त्या पूर्णपणे वैद्य आहेत. नवीन नोटा आल्या तरी दोन्ही नोटा समांतर पणे वापरता येतील. बँका, एटीएम मधून तुम्हाला नव्या नोटा मिळू शकतात. पण जुन्यायी तसेच चालतील कोणतीही घाई करायची गरज नाही. गावात, शहरात, बाजारात, शाळा आणि ऑफिसमध्ये सगळीकडे ही दोन्ही नोटा एकत्रित चालतील, असा आरबीआयने स्पष्ट केला आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी! रिझर्व बँकेने 100 व 200 नोटेबाबत घेतला मोठा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलास

Leave a Comment

error: Content is protected !!