रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील रेशन कार्ड लाभार्थी असेल तर eKYC करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे चला तर जाणून घेऊया काय आहे नवीन अपडेट ! Ration Card News

रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. सरकारने अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड प्रमाणीकरण करणे आवश्यक केले आहे. हे प्रमाणिकरण 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या मुदतपूर्वी तुम्ही eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर लाभार्थ्यांना रेशनच्या माध्यमातून धान्य मिळणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे.

यामुळे जर तुम्हाला यापुढे रेशन कार्डचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर 15 फेब्रुवारी पर्यंत तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे खूप गरजेचे आहे. तसेच याची eKYc करणे देखील गरजेचे आहे.

रेशन कार्डधारकांसाठी मोठी जबाबदारी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये धान्य दिले जाते. ही योजना गरजू व गरीब कुटुंबासाठी एक मोठी वर्धनकारक ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवले जाते. या प्रक्रियेत पारदर्शक आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आधार प्रामाणिकरण आणि eKYC करणे आवश्यक आहे. सरकारने प्रक्रियेसाठी गावोगावी शिबिरे आयोजित केलेली आहेत. तसेच शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य या शिबिरामध्ये भाग घेऊन आधार प्रमाणिकरण करण करणे आवश्यक आहे.

eKYC प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन आपले आधार कार्ड E-KYC कराहावे लागणार आहे. तसेच इथे अंगठ्याचा ठसा देऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. हे प्रमाणिकरण 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास, लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

दुकानदारांसाठी सूचना- 7 तारखेपर्यंत अन्नदीन साजरा करणे आवश्यक.

दुकानदारांना दरमहा 7 तारखेपर्यंत अन्नदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे आवश्यक असणार आहे. तसेच दरमहा पंधरा तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करणे बंधन करण्यात आलेले आहे. यासंदर्भामध्ये पुरवठा विभागाने दुकानदारांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

E-श्रम पोर्टल वरील कामगारांसाठी विशेष संधी!

केंद्र सरकारच्या इश्रम पोर्टलवरील नोंदणी केलेल्या आणि स्थलांतरित व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार तातडीने शिधापत्रिका दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ईश श्रम पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक असणार तसेच त्यांना अद्याप शिधापत्रिका मिळाली नाही त्यांना आपल्या तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह शिधापत्रिकासाठी अर्ज करावा लागणार आहे. जिल्हातील सर्व तहसील कार्यालयातून शिधापत्रिका वाटपाची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड

गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये लाभ देण्यासाठी “One Nation One Ration”ही योजना राबविण्यात येत आहे यामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून अन्नधान्य खरेदी करू शकतात. परंतु त्याच दुकानात त्यांनी eKYC करणे आवश्यक असणार आहे. लाभार्थीने आपल्या गावातील रेशन कार्ड दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.

15 फेब्रुवारी पूर्वी E-KYC न केल्यास धान्य मिळणार नाही

गरीब कुटुंबांन लाभ मिळावा व या योजनेमध्ये पारदक्षता यावी यासाठी शासन अंतर्गत कठोर नियम व पावले उचलली जात आहे. जो शिधापत्रिका धारकांनी 15 फेब्रुवारी पूर्वी त्यांचे आधार कार्ड प्रमाणिकरण आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना यापुढे अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही. मात्र, 15 फेब्रुवारी पूर्वी हे प्रमाणे करण झाल्यास त्यांना धान्याचा लाभ मिळणार आहे.

रेशन कार्डधारकांनी त्वरित कृती करावी

रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर कोणतेही गैरसमजात न राहता वेळेत आधार प्रमाणिकरण करणे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळेच अन्नधान्याच्या वितरणाचे प्रक्रिया अधिक सुलभ पारदर्शक होणार आहे. काय 15 फेब्रुवारी पूर्वी त्वरित लाभार्थ्यांनी आपल्याला नजीकच्या रेशन दुकानांमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे असे देखील स्पष्ट मत पुरवठा विभागाने व्यक्त केले आहे.

हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल

9 thoughts on “रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!”

Leave a Comment

error: Content is protected !!