Rains Maharashtra | सध्या राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे यामुळे शेती व नागरिकांनी वरती मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. ते म्हणजे दिवसात दिवस वाढत चाललेले उष्णता या उष्णतेने नागरिकांना मोठे हैराण केलेले आहे. व वातावरणात अचानक बदल झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान (IMD) खात्याचा नवीन अंदाज मध्ये काय महत्त्वाची माहिती दिली आहे हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Rains Maharashtra
सध्या राज्याच्या हवामान मोठा बदल झालेला पहिला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तीव्र उष्णतेचा तडका जाणवत आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र (Strong sun rays) जळा सहन करावा लागत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी (Unseasonal rain) पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि इतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला मुळे, वातावरणाचा बदल होत असल्याचं हवामान विभागाने पष्ट केलेले आहे.
राज्यामध्ये उन्हाच्या झळ्या वाढत असल्याने, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40°c च्या वर गेलेले आहे. विदर्भातील ब्राह्मणपुरी येथे सोमवारी 41°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अकोला, चंद्रपूर, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील 40°C वर तापमान पोहोचले आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज!
राज्यात अनेक ठिकाणी भारतीय हवामान खाते आणि अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. IMD च्या नवीन इशारानुसार, विदर्भातील अकोला व अमरावती उगवता इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पार्श्वभूमी वरती चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे. अन्यथा नुकसानीला सामोरे जावे लागेल.
राज्यामध्ये रब्बी हंगामातील पिकाची काढणी सुरू आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा व द्राक्ष यासारख्या पिकांची अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या वर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
हवामान बदलाचे कारण काय ?
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील वातावरणामध्ये हा बदल झाले असल्याचे म्हटले जात आहे. तर कमी बाबाचा पट्टा वाऱ्याच्या प्रवाहात बदल घडवून आणत असल्याचे दिसत आहे यामुळे महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तीन दिवस हवामान बदलू शकते.
शेतकरी बांधवांना अवकाळी पावसामुळे तुमचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अवमान विषयक ताजा अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा!