Punjabrao Dakh Havaman Andaj: राज्याचे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे त्यांच्या हवामान अंदाज मध्ये राज्यातील हवामान बदलाची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. पंजाबराव काय म्हणाले आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.Punjabrao Dakh Havaman Andaj
खरंतर गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांचा टप्पा पार केलाय, यामुळे अंगाची लाहीलाही करणारी गर्मी पाहिला मिळत आहे. परंतु आत्ता नागरिकांना मोठा दिलासा पाहिला मिळणार आहे वातावरणात बदल झाल्यामुळे अचानक पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे पंजाबराव यांनी पावसाबाबत मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. शेतकऱ्यांसाठी मे महिना पहिल्या आठवड्यात अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
राज्याच्या हवामानात अचानक बदल घडत असून वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे. डख दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळ यांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तर पंजाबराव यांनी मराठवाडा आणि सीमा वरती भागांमध्ये देखील वादळी वातावरण तयार होत असल्याने नांदेड, धर्मबाद, देगलूर, लातूर, परभणी, बीड, हिंगोली, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी असा सल्ला देखील डख यांनी दिलेला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक खबरदारी
तांदूळ उत्पादक शेतकरी काढण्याच्या कामात गुंतलेले आहेत. मात्र, या हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस खांद्यावर मोठा परिणाम करू शकतो. डख यांनी सल्ला दिला आहे की, दोन मे पूर्वी कांदा काढणी पूर्ण करून तो तातडीने सुरक्षित जागी झाकून ठेवावा. पावसामुळे कांदा भिजला तर त्याची नुकसानीची भीती व्यक्त केली आहे.
याचबरोबर, पुण्यावर असलेली इतर पिके ही धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे डख यांनी शेतकऱ्यांना त्वरित फवारणी करून बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध करण्याचाही सल्ला दिलेला. हवामानातील अस्थिरता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर सजग राहणे फार आवश्यक आहे.
पंजाब डख यांचा मान्सून बाबत मोठा अंदाज
अशा अस्थिर हवामानाच्या पार्श्वभूमी वरती डख यांनी यावर्षी मान्सून बाबत आवश्यक अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता असून मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या गाभाऱ्यात समाधान असेल.
तुम्ही जर शेती करी असाल, तर हवामानाचा अंदाज लक्षात घेत तुम्ही तुमच्या शेतीचे नियोजन करायला हवे. राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक यांचे मार्गदर्शन लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य पावला उचला. हवामानाची थोडीशी बदलती झुळूक मोठा परिणाम करू शकते, हे विसरू नका. तर पुढील हवामान कसे राहणार आता हे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!
5 thoughts on “पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज”