Pm Kisan Yojana | अनेक दिवसांपासून आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. तो म्हणजे मागच्या चार महिन्यापूर्वी आपल्या खात्यावरती जमा झालेला पी एम किसान योजनेचा हप्ता (pm Kisan Yojana Hapta) कधी बर जमा होईल. परंतु हा हप्ता मिळेल मध्ये जमा होईल हे नक्की खरं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही अशीच शक्यता आहे. तर कोणत्या कागदपत्र आहे महत्त्वाचे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Pm Kisan Yojana
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वात प्रथम प्रसारमाध्यम व सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जून महिन्यात केंद्र सरकारकडून जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. परंतु अद्याप शासनाकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून वाट पाहावी लागणारी शेखर आहे. खरिपाच्या तयारीने शेतकरी बिझी झालेले असतानाच या पैशांची अपेक्षा प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. कारण खतं, बियाणं, मशागत यासाठी निधीची नितांत गरज भासत आहे.
याच शेतकऱ्यांना मिळणार ₹2000 हजार रुपये
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२५ पर्यंत जे शेतकरी ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणीकृत झाले आहेत आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा शेतकऱ्यांनाच या २०व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार आता शेतकऱ्यांची यादी अंतिम करत असून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून निधी मिळावा, यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. यामुळेच हप्त्याच्या वाटपामध्ये थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे.
बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा त्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शासनाने यासाठी १५ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हप्त्याच्या वितरणात ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. १५ जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली, केवायसी अपडेट केली, त्यांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये आतुरता
खरिप हंगामाची चाहूल लागली आहे. शेतकरी बांधवांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत आणि दुसरीकडे सरकारच्या खात्यातून येणाऱ्या हप्त्याचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. काहीजणांनी खताचे पैसे उधारीवर दिले आहेत, तर काहींनी मशागतीसाठी कर्ज घेतलं आहे. अशा वेळी पीएम किसान हप्त्याचा निधी म्हणजे एक दिलासा ठरेल यात शंका नाही. पण या दिलास्यासाठी आता तात्काळ ‘ॲग्रीस्टॅक नोंदणी’ आणि ‘केवायसी’ पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. कारण हे काम लांबवायचं झालं, तर पुढचा हप्ता मिळण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे.
म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या सेवा केंद्रात जाऊन, CSC सेंटरच्या माध्यमातून आपली नोंदणी, आधार लिंकिंग, बँक तपशील आणि इतर माहिती तपासून लगेच प्रक्रिया पूर्ण करावी. कारण केंद्र सरकारकडून हप्ता केव्हाही वितरित केला जाऊ शकतो, पण नोंदणी नसेल तर तो तुमच्या खात्यात पोहोचणारच नाही. शेतमळ्याचं काम सुरू असतानाच, सरकारने दिलेली ही संधी गमवू नका.
शेतकरी बांधवांना आपण अशा पद्धतीने पाहिले की, तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे तपशील आणि कागदपत्रे आवश्यक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी वरची माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे?
1 thought on “Pm Kisan Yojana : शेतकऱ्यांनो हे कागदपत्र आहे का? तरच तुमच्या खात्यावरती ₹2000 रुपये जमा होणार”