Panjabrao Dakh Rain Update: सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहे. ज्यामुळे नद्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण अनेक दिवसापासून रखडलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला आहे. मागील काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता वर्तवली जात होती. पण आता वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सूनचा वेग वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वातावरणात झालेल्या बदलांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसत आहे. हवामान खात्याने सध्या राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 19 जून रोजी वर्तवलेल्या हवामान अंदाज मध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 19 ते 21 जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर…
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
दरम्यान पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 19 20 आणि 21 जून या तीन दिवसाच्या कालावधीत राज्यात जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. हा पाऊस सर्व दूर पडणार नसला तरी येत्या तीन दिवसात काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये भाग बदलत हा पाऊस हजेरी लावणारा असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. Panjabrao Dakh Rain Update
हे पण वाचा| राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा! शाळांनाही सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे अहमदनगर धाराशिव बीड छत्रपती संभाजी नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- छत्रपती संभाजी नगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम नांदेड धर्माबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.
- अमरावती अकोला वर्धा आणि अकोट या विदर्भातील बागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
हे पण वाचा| पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार; तुमच्या खात्यात कधी जमा होणार ₹2,000?
पंजाबराव डख यांनी हेही स्पष्ट केले आहे की, हा अंदाज संपूर्ण जिल्ह्याचा असतो आणि त्यामुळे पाऊस पूर्ण जिल्ह्यांमध्ये पडेल असे नाही. काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो. तरीही 19 ते 21 जून दरम्यान राज्यात सरासरी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याने हा पाऊस कापसी सारख्या पिकांसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले की, सध्या राज्यात सुरू असलेले वारे 24 जून नंतर थांबणार आहे. यानंतर मात्र पावसासाठी अधिक पोषक वातावरण तयार होणार आहे. ज्यामुळे मान्सून आणखीन सक्रिय होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांनी पुढील तीन ते चार दिवस म्हणजे 19 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या पावसाकडे व हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाच्या या आगमनाने शेताच्या कामांना गती मिळणार असून शेतकऱ्यांच्या अशांना नवीन पंख मिळणार आहेत.
1 thought on “राज्यात या तारखेपासून मान्सूनचा जोर वाढणार; पंजाबराव डाख यांचा नवीन हवामान अंदाज…”