One State One RBI : वन स्टेट, वन आरबीआय म्हणजे एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक या केंद्र सरकारच्या महत्वकांशी योजनेअंतर्गत देशातील 15 प्रादेशिक बँका आजपासून म्हणजे एक मे पासून बंद करण्यात येत आहेत. मात्र ही बंदी म्हणजे बँका बंद होणे नाही, तर त्यांचे इतर मोठ्या ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे या निर्णयामुळे देशातील RRBs ची संख्या 43 वरून थेट 28 वरती येणार आहे. One State One RBI
यावेळी करण्याचा परिणाम महाराष्ट्र सह देशातील अकरा राज्यांमधील खातेधारकांवरती होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात कर्नाटक ओरिसा मध्य प्रदेश जम्मू-काश्मीर आणि राजस्थानचा समावेश आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही ग्रामीण बँकेचा समाविष्ट असून स्थानिक ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सध्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये खाते बँक बंद होणार का? बँक बंद झाली तर आमच्या पैशाचं काय होणार असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. परंतु बँकेचे नाव बदलले जाणार असले, तरी खातेदारकांचे सर्व पैसे, कर्ज, योगा आणि सेवा जसेच्या तसे सुरू राहणार आहेत. केवळ बँकेचे नाव व खाते क्रमांक यामध्ये बदल होईल. यासोबत ग्राहकांना नवीन चेकबुक आणि पासबुक देखील दिले जाणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, विलीनीकरणामुळे बँकिंग सेवा अधिक सशक्त होईल. डिजिटल व्यवहार, ग्राहक सेवा आणि कर्ज व्यवहारी यामध्ये पारदर्शकता आणि वेग येईल. एकसंध बँक प्रणालीमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना अनुभव मिळेल.
जर तुमचे खाते कोणत्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या बँकेकडून नवीन खाते तपशील, पासबुक वरचे बुक मिळू शकता. दरम्यान, जुना चेक बुक काही काळ वैद्य राहणार आहे मात्र पुढील व्यवहारांसाठी नवीन अनिवार्य असणार आहे.
हे पण वाचा | आत्ताची मोठी बातमी! आरबीआय ने पुन्हा एकदा या दोन बँकेचे केले परवाने रद्द! वाचा सविस्तर माहिती