Namo Shetkari : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केलेले आहेत. हे दोन हजार रुपये बिहारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 91 लाख शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत. या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळालेले आहेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Namo Shetkari
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली. जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जातात. जवळपास राज्यात 91 लाख शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. आता हा हप्ता कधी जमा होणार याची आतुरता शेतकऱ्यांना लागलेली आहे. एकीकडे केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत तर माजी लाडकी बहीण योजनेतील तीन हजार रुपये सात मार्च रोजी महिलांना दिले जाणार आहेत तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत स्पष्टता आलेली नाही.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभ कोणाला मिळतो
राज्य सरकारच्या कृषी विभागांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये या योजनेत जवळपास 91.45 लाख शेतकरी पात्र आहेत महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत या योजनेसाठी 9000 कोटी रुपये खर्च केलेला आहे या योजनेचा लाभ जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना दिला जातो. सरकार केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मागवते व त्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये वर्षासाठी सहा हजार रुपये जमा करते.
हे पण वाचा | Namo Shetkari Samman Nidhi Yojana : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, वाचा सविस्तर
राज्याच्या लाडक्या बहिणींना 7 मार्च रोजी तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लाभार्थ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे या हप्तेची आतुरता शेतकऱ्यांना लागलेली आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नये.