Mumbai Red Alert : गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे ना अशातच राज्यातील काही जिल्ह्यांसोबत मुंबईला एक विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई दुपारपासून मुसलदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणी साचले, असून काही भागांमध्ये वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. त्यातच हवामान खाते आणि अचानक पुढील तीन तासांसाठी ‘रेड अलर्ट’ (Mumbai Red Alert) जाहीर केल्यामुळे नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण पसरल आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात असून, प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच थांबा. Mumbai Red Alert
दोन दिवस उन्हाच्या तपस जणांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या पावसाने मोठा दिल्यास दिला असला तरी हा दिलासा फार काळ काही टिकणर नाही असं वाटत आहे. शहरात काही ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली असून, विशेषता पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हलक्या अडथळ्यांची नोंद झालेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनानुसार 12 ते 13 जून दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईला मिळालेला हा रेड अलर्ट गंभीरपणे घ्याव्या लागणार आहे.
हे पण वाचा | राज्यातील या 30 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा
तसेच मुंबईच्या आसपास भागात विशेषता कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अचानक जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील छत्र्या, पाण्याने साचलेले रस्ते आणि वाहतूक कोंडी यांचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, दोन दिवसांच्या उष्णतेनंतर आलेला हा बदल मुंबईकरांना थोडासा सुखद वाटतोय.
त्यानंतर कोकणातील रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. अलिबाग, उरण, माणगाव, नागोठणे, पाली यासारख्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून, जमिनीचा ताण थोडा सैल झाल्याचा पाहायला मिळतंय. या बाबा शेतकरी वर्गाने पेरणीची तयारी सोमात सुरू केलेली आहे मात्र अवकाळी पावसानंतर झालेल्या खंडामुळे शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे सहा दिवसांचा मोठा गॅप पडलेला आहे. आता पाऊस सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदात भर पडली आहे.
प्रादेशिक हवामानाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असून, उद्यापासून नांदेड, बीड, आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला गेला आहे.
सध्याच्या पावसाचा या अचानक आगमनामुळे संपूर्ण राज्यात अनिश्चित आणि सतर्क वाढली आहे. शहरी नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर जाण टाळावं, तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनेनुसार पेरणीची तयारी करावी. पाऊस जितका जीवनदायी आहे तितकाच अति झाल्यास तो धोकादायक ठरतो. त्यामुळे प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचनेकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.