मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेची पुन्हा होणार पडताळणी? आता या महिला ठरणार अपात्र

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वकांशी योजनेत मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे. लाभार्थ्यांची अर्जाची आता काटेकोरपणे छाननी सुरू झालेली आहे, आतापर्यंत तब्बल 19 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेला आहे. सरकारकडून आता अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादित आहे का, याची बारकाईने तपासणी करत आहेत. यातून आणखी हजारो अर्जदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा |Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात आले का चेक करा

या योजनेअंतर्गत राज्यभरातून जवळपास 2 कोटी 65 लाख महिलांनी नोंदणी केली होती, आणि त्यातील 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. एप्रिल महिना पर्यंत एकूण नऊ हप्ते म्हणजे 13,500 रुपये थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र आता लाभार्थ्यांच्या उत्पन्न मर्यादेची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अहवालयानंतर अर्जदारांचे ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) तपसले जाणार आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

सरकारच्या मते, या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न अडीच लाखन पेक्षा जास्त नसावं, ही अट मोडणाऱ्या महिलांनी चुकीचा लाभ घेतल्या असल्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेतल्या विरोधात कठोर कारवाई होणार आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

त्यातच आणखी एक मोठा धक्का म्हणजे राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांनीच या योजनेचा गैरफायदा घेतल्याचा उघडकीस आलेला प्रकार. शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं असतानाही सुमारे 1.20 लाख महिला कर्मचारी, विशेषतः वर्ग तीन आणि वर्ग चार मधील महिला, लाभ घेतल्याचा उघडकीस आला आहे. याच पार्श्वभूमी वरती अजून सहा लाख महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

या योजनेचा खरा लाख गरजू महिलांपर्यंत पोहोचावाया हेतूने ही छाननी करण्यात आलेली आहे. पण त्यामुळे काही प्रमाणिक लाभार्थ्यांनी महिलांचे काळजाच धडधड वाढ आहे. सर्कल करून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांनी आपलं घर चालवलं आहे. त्यामुळे अयोग्य माहिती दिलेल्या विरोधात सरकारकडक पावले उचलणार असून, गरजूंनी मात्र योग्य कागदपत्रे आणि उत्पन्न दाखले तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेली आहे.

सध्या राज्यभरात या योजनेविषयी नव्याने चर्चा सुरू झाल्या असून, खरी पात्रता आणि गरज ओळखूनच पुढील हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण लाभार्थ्यांनी आता काळजीपूर्वक प्रत्येक तपशील भरावा लागणार आहे, अन्यथा योजनेच्या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!