Monsoon Update : भारतीय हवामान खात्याने नुकताच एक मोठा अंदाज वर्तवला आहे. या त्यांच्या हवामान अंदाज मध्ये त्यांनी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खास करून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी हे अंदाज खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पाच ते सात जून दरम्यान वादळ आणि पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया नवीन अंदाज Monsoon Update
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान खात्याने, एक मोठा हवामान अंदाज वर्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक सूचना जारी केलेले आहे. पाच ते सात जून दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली साठी भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा वर्तवला आहे.
तसेच पाच जून रोजी छत्रपती संभाजी नगर आणि बीड जिल्ह्यात ठिकाणी पाऊस पडेल असा इशारा दिलेल होता. त्यानुसार बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच सात जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी वादळी वारा, मेघ गर्जना, आणि वाऱ्यांचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर या ठिकाणी कमाल तापमान पुढील तीन दिवसात फारसा तफावत जाणवणार नाही, परंतु त्यानंतर हळूहळू वाढवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. किमान तापमान पुढील पाच दिवस फारशी तफावत जाणार नाही.
शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या
पावसाळ्यामध्ये सुरुवातीला काही काळ शेती संबंधित कामे काळजीपूर्वक आणि हवामानाचा अंदाजानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी वाहन चालवताना वाऱ्यांचा वेग आणि पाऊस लक्षात घेऊन सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे तर काही ठिकाणी मोठी हानी देखील होण्याची शक्यता आहे यामुळे हवामान तज्ञांनी या पार्श्वभूमी वरती महत्त्वाचा सल्ला देखील दिलेला आहे.
हे पण वाचा | राज्यातील या 30 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा