राज्यात मान्सून दाखल! मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

Monsoon Rain Forecast: सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. राज्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असल्यामुळे सर्वत्र पाऊस हाच चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला हवामान खात्याने आणि कृषी विभागांना एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.

मान्सूनचा वेग यावर्षी लवकर येताना दिसत असला तरी लवकरच मान्सूनचा वेग मंदावेल त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नका असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पुढच्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरडे हवामान परत येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आता करू नका, पेरणी केल्यास तुमचे बीज वयाला जाऊ शकते. यामुळे तुमच्या सर्व मेहनतीवर व खर्चावर पाणी फिरू शकते. Monsoon Rain Forecast

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी राज्यात मान्सून भरभरून कोसळणार..

यावर्षी मान्सूनने वेळेपेक्षा दहा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 25 मे रोजीच दक्षिण कोकणात मान्सून ने प्रवेश केला आहे. केरळमध्ये 25 तारखेला दाखल झाल्यानंतर लगेच महाराष्ट्रातही त्याचे आगमन झाले आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी देखील सुरू केली आहे. पण याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सावधानगिरी बाळगण्याचा इशारा करण्यात आला आहे.

राज्यात मान्सून दरवर्षीच्या तुलनेत लवकर दाखल झाला असला तरी 27 मे पासून मान्सूनचा वेग कमी होणार असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा मोठा खंड पडू शकतो. असा अंदाज हवामाना विभागाकडून व कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर कोकण वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात तापमानात देखील वाढ होणार आहे. 5 जून नंतर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पुन्हा मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हे पण वाचा | कांद्याची आवक वाढली! जाणून घ्या कांद्याचे बाजार भाव..

पेरणीसाठी घाई करू नका..

शेतकरी आकाशातल्या ढगाकडेच पाहत असतात कधी पाऊस पडेल आणि कधी आपण शेतात पेरणी करू याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष असते. राज्यात काही प्रमाणात जरी पाऊस कोसळला तर लगेच शेतात जायचं आणि आपली पेरणी करून घ्यायची, मात्र त्यानंतर पावसात खंड पडल्यानंतर शेतकऱ्यांचे श्रम आणि आर्थिक खर्च पूर्णपणे वयाला जातो. आपण बऱ्याच वेळा असे पाहिले आहे की, अति घाई मध्ये केले जाणारे पेरण्या हवामानाच्या अस्थिरतेमुळे वाया गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस जरी लवकर दाखल झाला असला तरी पेरणीसाठी घाई करू नका व चांगला पाऊस होण्याची वाट पहा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

सध्या राज्यात काही भागात मुसळधार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी हवामान कोरडे आहे. दक्षिण कोकण गोवा आणि काही किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. मात्र मागील काही दिवसात काही ठिकाणी नद्या फुल भरून वाहत आहे तर काही भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाला आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! मे महिन्याचा हप्त्या या दिवशी जमा होणार? वाचा सविस्तर

राज्यातील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश या भागात मान्सून कधी दाखल होणारे याची वाट शेतकरी पाहत आहेत. या ठिकाणी एखाद दुसरी स्तरी वगळता फक्त ढगाची गर्दी दिसली आहे. मात्र या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की, खोट्या बातम्या वर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावर चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. आपल्या भारतीय अधिकृत हवामान अंदाज आणि कृषी केंद्राच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घ्या.

शेती करणं म्हणजे फक्त मेहनत करणं नव्हे तर योग्य वेळी योग्य ती काळजी आणि योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचा असतो. पाऊस झालाय म्हणून लगेच शेतात जाऊन पेरणी करणे योग्य नाही. पेरणीसाठी योग्य वेळ योग्य जमीन योग्य वातावरण या सर्व गोष्टीचे एकत्र सांगड घालावी लागते. चुकीच्या वेळी पेरणी केली तर पुढचा हंगाम पूर्णपणे हातातून निघून जाऊ शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनो हवामान खात्याने दिलेल्या इशारा लक्षात घ्या.

मान्सून जरी लवकर आला असला तरी पेरणीसाठी घाई करू नका. थोडं थांबा आकाशाकडे लक्ष द्या सरकारच्या सूचनेकडे लक्ष द्या, आणि त्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कारण शेती पूर्णपणे निसर्गाशी निगडित आहे, शेतीसाठी निसर्गाने साथ दिली नाही तर तुमची पूर्ण मेहनत आणि खर्च व्हायला जाऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!