शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी राज्यात मान्सून भरभरून कोसळणार..

Monsoon New Update: आपला भारत देश कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना यावर्षी मान्सून किती होणार हे जाणून घेण्यात साठी मोठी उत्सुकता लागली आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस भरभरून कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या चार महिन्याचे पूर्वानुमान देतानाचा प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक पंधरवड्यात कुठे किती पाऊस पडेल हे कोणत्याच आधारावर सांगता येत नाही तरीदेखील तुलनेने यावर्षी मान्सून लवकर राज्यात दाखल होणार असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या मान्सूनमुळे पाणीसाठा पुरेपूर होण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

हे पण वाचा | कांद्याची आवक वाढली! जाणून घ्या कांद्याचे बाजार भाव..

राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता न बसता यावर्षी देखील चांगले उत्पन्न मिळावे यासाठी चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात येणारा मान्सून कसा असणारे याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान केरळात वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये अंदाजे 27 मे रोजी मान्सून दाखल होईल अशी सरासरी तारीख समोर आली आहे. राज्यात मान्सून दहा-बारा तारखेला दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र कोणत्या क्षणी दाखल होईल अशी कोणतीही तारीख सांगता येत नाही. त्यास अनेक कारणे असले तरी यंदा राज्यात मान्सून भरभरून पुसणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

यंदाच्या मान्सूनच्या चार महिन्यात प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला पाऊस जोरदार असेल असे गृहीत धरणे योग्य नाही. कारण पावसाचा पुरेपूर अंदाज लागले कठीण आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे संपर्क साधून शेतीच्या कामाचे योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. राज्यातील हवामान अंदाजावर व भारतीय हवामान विभाग दिल्या जाणाऱ्या रेड ऑरेंज कलर वर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तीन ते चार तासाच्या पावसावरही शेतकऱ्यांनी लक्ष देऊन स्वतःचे भावी पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. यांची जोड कायमच शेतकऱ्यांसोबत आतून शेतकऱ्यांना योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन या विभागांतर्गत केले जाते. Monsoon New Update

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! मे महिन्याचा हप्त्या या दिवशी जमा होणार? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनी मुहूर्त मॅप आणि दामिनी ॲप सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थोडीशी माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाचा खंड आणि पावसाचे वातावरण शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणे शक्य आहे. हवामान विभागाचा मानस प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. मात्र संपूर्ण चार महिने पाऊस कसा असेल हे सांगणे खूप अवघड आहे. प्रत्येक मान्सून पावसाचे टप्पे असतात जून महिना हा संक्रमणाचा काळ असतो. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने महत्त्वाचे असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाशी संपर्क साधून पावसानुसार योग्य ते नियोजन केले पाहिजे.

दरम्यान आता मान्सून यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण राज्यात व्यापेल असा अंदाज आहे. शिवाय यंदाच्या मान्सून मध्ये अल निनो नाही. या सगळ्या गोष्टी तटस्थ असल्या तरी ग्लोबल मॉड्युल असे दर्शवीत आहे की पावसाचे चार महिने चांगले जाण्याची शक्यता आहे. यंदा राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाचा आधार मिळणार असून त्यांच्या उत्पादनात देखील वाढ होण्याच्या अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडून माहिती घ्यावी. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे. यावर्षीचा मान्सून शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल ही शक्यता न करता येत नाही. राज्यात विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांना निश्चित यावर्षीचा मान्सून चांगला जाईल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी राज्यात मान्सून भरभरून कोसळणार..”

Leave a Comment

error: Content is protected !!