राज्यातील या जिल्ह्यांना इशारा! शेतकऱ्यांना या हवामान अंदाज याकडे लक्ष द्या

Marathwada Weather Updates : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळालं. उन्हाच्या उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता थोडासा दिलासा मिळण्याचे चिन्ह आहेत. मुंबई सह ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवार साठी येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. याचा अर्थ असा की, या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या त्यामध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. शरद सोमवार सकाळी पासून ढगा वातावरण पाहायला मिळत होतं हवा गारठलेली वाटत होती. एकीकडे उकडाही, पण तेमागे लपलेला पाऊस मुंबईकरांना जाणवत होता. Marathwada Weather Updates

सांताक्रुज मध्ये 33.7 अन्स सेल्सिअस आणि कुलब्यात 34.2 अंस सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. अद्रतेच प्रमाणही वाढलेलं दिसलं- कुलबा परिसरात 70% तर सांताक्रुज मध्ये 63% ही आकडेवारी सांगते की पावसासाठी आवश्यक असलेली आद्रता आता वातावरणात भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईसारखा शहरात पाऊस आहे की व हवामान बदल नाही, तर वाहतूक, दळणवळण, आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे येलो अलर्ट ही केवळ शासकीय सूचना न राहता लोकांनी सावध रहाणे आवश्यक आहे.

कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार सह, अनेक जिल्ह्यांना देखील याचा कालावधी त येलो अलर्ट दिलेला आहे. तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी, बीड, जालना,लातूर, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये मंगळवारीपासून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगड मधून येणारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणारे चक्रीय वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या घड्याळाच्या दिशेने फिरणारे वारे यांच्या हंगामामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं निवृत्त हवामाना तज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.

या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. बियाणं टाकण्याची वेळ जवळ येत असताना, अजून घेणाऱ्या गारपिट आणि पाऊस कधीही फायदेशीर तर कधी नुकसानदायक ठरतो. एका बाजूला उन्हाची लाट उचलत असली तरी दुसरीकडे उष्णता अजून कायम आहे. शहरात राहणाऱ्यांसाठी हा पाऊस सुखद असला, तरी ग्रामीण भागात तो किती प्रमाणात, कोणत्या वेळेस, आणि किती काळ टिकतो यावर शेतीचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या प्रत्येक सूचनांना शेतकरी बारकाईने विचार करत आहेत.

या पावसामुळे सध्या तरी महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटे पासून थोडासा दिल्यास मिळालेला दिसतोय. पण हवामानातील ही अस्थिरता पाहता, तुला आठवड्यामध्ये राज्यभरात हवामानाचे चढ-उत्तर सुरू राहतील. असं संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील नागरिकांना येत्या काही दिवस हवामानाचा खात्याच्या अपडेट कडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि योग्य खबरदारी घ्या .

हे पण वाचा : शेतकऱ्यांनो सावधान! राज्यातील या दहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला मोठा अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!