Maharashtra Weather Updates : सध्या राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला आहे. काही दिवसांपूर्वी लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्र्या, गॉगल, पाणी अशा उपायोजना करत होते. पण आता हवामान विभागाने थेट रेड अलर्ट जारी केलेला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात उनापाटोपट पावसाचं आणि विजांचा संकट उभ राहिला आहे. विशेषता शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच बिकट ठरण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Updates
भारतीय हवामान खात्याने (IMD) ताजा अपडेट नुसार विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाने विजांचा कडकडाट याचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमध्ये वादळी वारासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात वाऱ्यांचा वेग ताशी 50-60 की मी इतका जोरदार असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडणं धोक्याचं ठरू शकता. काही भागांमध्ये झाड उन्हाळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेमुळे आधीच जनजीवन कोलमडलेलं असताना आता या अतिवृष्टीचा इशारामुळे शेतकऱ्यांच टेन्शन वाढला आहे. अनेक भागात आंबा, भुईमूग, हरभरा, ऊस अशा पिकांची काढणे किंवा शेवटची वाढ सुरू आहे. अशावेळी जर जोरदार पाऊस आला तर हे पीक पूर्णपणे भुई सपाट होण्याची शक्यता आहे.
या वादळात वीज पडण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वी दीक्षित अशीच वादळी हवेमुळे काही भागात शेतात काम करणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विज पडण्याचा धोका टाळण्यासाठी शेतकरी, मजूर यांनी पावसाळी वातावरणात मोकळ्या शेतात जाण टाळावं.
याशिवाय, जनावर, झाडं, विजेचे खांब, घरावरील पत्रे यांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनावर सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि घरांचं संरक्षण करून घ्यावं.
भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यांना हाय अलर्ट दिलेला आहे. इथे लहान चुका मोठ्या आपत्तीमध्ये बदलू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाऱ्यांचा वेगाशी स्पर्धा न करता, हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
पाऊस पडणे हे आनंदाची बाब आहे, पण जेव्हा तो जीव घेणा ठरतो, तेव्हा त्याचा संकट रूप घेते. म्हणूनच हवामान बदलाच्या काळात सावध राहणे शहाणपणाची गोष्ट आहे.
हे पण वाचा : भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!