राज्यात मोठा हवामान अंदाज; या सात जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, आयएमडीने या पार्श्वभूमी वरती 28 एप्रिल 2025 रोजी गडचिरोली, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा नुकसानीला सामोरे जावे लागेल. Maharashtra Weather Updates

विदर्भात तापमानात घट, पण वादळी वाऱ्यांची संभावना

विदर्भातील काही भागांमध्ये तापमानत बदल झाल्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांचा आणि पाऊस होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने हवामान अंदाज दिला आहे की, यवतमाळ, शिरोली आणि अमरावती जिल्ह्यात 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जना सह पाऊस होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानींना सामोरे जाऊ लागू शकते. तसेच इतर नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटले

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये तापमान एक ते दोन अंश अंश सेल्सिअस घटले आहे. कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूर सह विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या भागांमध्ये तापमानातील घट पाहायला मिळाली आहे. परंतु, राज्याच्या इतर भागांमध्ये तापमान 40 पर्यंत पोहोचलेचे नोंदवले गेले आहे, विशेषतः मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजी नगर परभणी आणि बीड यासारख्या जिल्ह्यांमध्ये.

उष्णता आणि दमट वातावरणाची शक्यता

पुढील दोन दिवसांमध्ये विशेषतः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने राज्यातील काही भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे यामुळे ज्या भागात जास्त तापमान आहे तिथे नागरिकांनी थोडेसे जास्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलेला आहे.

राज्यभरातील हवामान बदलामुळे नागरिकांचे कसरत सुरू आहे. शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यांचा आणि अवकाळी पावसाचा संभाव्य फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यासोबतच, लोकांना सावध राहून घराबाहेर पडण्यास सजग राहणे आवश्यक आहे.

येलो अलर्ट : यापूर्वीचा अनुभव

येलो अलर्ट म्हणजे त्या ठिकाणी काही धोक्याची शक्यता असलेली परिस्थिती आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता असताना, नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिले जातात. ज्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाची तयारीत राहावं लागतं आणि वादळी वाऱ्यांपासून संरक्षण घेत राहावे लागतात. सध्या राज्यातील वातावरण होणारे बदल आणि त्यांचे संभाव्य परिणाम पाहता, येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

हे पण वाचा | सावधान! राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; IMD नवीन अलर्ट पहा

Leave a Comment

error: Content is protected !!