Maharashtra Weather Update: महाराष्ट्र मध्ये अनेक दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु 29 मे पासून राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांनी शेतातील कामे करण्यास भर दिलेला आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवरती मोठे अवकाळी संकट कोसळले. मात्र आता हवामानामध्ये मोठा बदल झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, राज्यामध्ये पुढचे दहा ते 15 दिवस पावसाचा जोर नाहीच असं म्हणावे लागेल यामुळे शेतकरी वर्गांना पुन्हा चिंता करावी लागणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. Maharashtra Weather Update
खरंतर गेल्या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्राने मराठवाड्यातील काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने काही भागात गारपीट सुद्धा झाली आहे. पण आता हे दाबाचे क्षेत्र विरलं असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता फारच कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटल. सहा ते दहा जून दरम्यान केवळ हलक्या सरींची शक्यता आहे. पण वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने हवामान कोरड आणि उष्ण राहण्याची संकेत आहेत.
मे महिन्यात राज्यात सरींच्या दहा पटीनं जास्त पाऊस झालेला आहे. परिणामी, शेतामध्ये चिखल साचला, मशागत थांबली आणि आता खरिपाच्या तयारीत अडथळे निर्माण झालेत. काही भागांमध्ये शेतकरी शेतात वापसा येण्याची वाट पाहत आहेत. काही खोल जमीन असलेल्या भागात मशागतीसाठी किमान दहा ते पंधरा दिवस वापसा लागलो. पण पावसानं हे सरे भैर वर्तन पाहता खरीप हंगामात उशीर होण्याची शक्यता न करता येत नाही.
शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संयमान हवामानाकडे पहावं लागणार आहे. कारण अजून मान्सूनचा मुख्य पाऊस आलेला नाही. हवामान खात्याने देखील स्पष्ट सूचना दिले आहेत की, पेरणीच्या आधी स्थानिक हवामानाचा अंदाज घ्यावा कोणतीही घाई करू नये. पावसाच्या वेळपत्रकात वारंवार होणारे बदल पाहता, चुकीच्या वेळी पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे.
दुसरीकडे, कोकणात देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात किनारपट्टीवरील पावसाने मुक्काम हलवला. हवामान विभागाने पष्ट केले आहे की, येत्या तीन दिवसात कोकणात केवळ तुरळ पावसाची शक्यता आहे आणि उष्णतेच्या झळा कायम राहतील. समुद्राच्या जवळ भागात आधीच निर्माण झालेल कमी दाबाचे क्षेत्र आता कमी झालेला आहे.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे दहा दिवस हवामान कोरडे राहणार असून शेतकरी आणि नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत निर्णायक आहे. तसेच पुढील हवामान कडे लक्ष देऊन आपल्या शेतातील पेरणी करावे आणि कुठलीही घाई गडबडी करू नये. अशाच हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.