Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी बांधवांना एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्याच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने एक नवीन रिपोर्ट जाहीर केलेला आहे. यामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या.
राज्य मध्ये गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. वातावरणात मोठा बदल झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी किती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसचे IMD ने आजही ॲलर्ट जारी केला आहे. Maharashtra Weather Update
अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका पाहायला मिळाला ( High Alert)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचे ढग कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पावसासाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. आज देखील पुन्हा एकदा राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला सून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याने पिके आडवे झालेले आहेत. तर होळी नंतर पारा वाढत असल्याचा हवामान विभागाने सांगितले होते तर दुसरीकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्याच ही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
या भागात इशारा
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात आज देखील हवामान खात्याकडून येलो आदरणीय दिलेला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि या सोबत गारपिटीचा इशारा देखील दिलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
भारतीय हवामान खात्याने, शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. शेतकऱ्यांनी गारपिटीचा व हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता योग्य वेळी मळणी तयार असलेला गहू पिकाची लवकरात लवकर मळणी करावी मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने किंवा सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतीमाल पावसामध्ये भिजणार नाही व त्यांचे नुकसान होणार नाही.