Maharashtra Weather Report : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनो हा हवामान अंदाज नक्की वाचा!

Maharashtra Weather Report : मान्सून ने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु अचानक त्याने दांडी मारलीय आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बियाणे पेरून ठेवला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ होत आहे. परंतु भारतीय हवामान खात्याने अशातच मोठा इशारा दिलेला आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की पुढील तीन दिवस म्हणजे 11 ते 13 जून दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सावध राहण्याचं गरजेचं आहे असं आव्हान केलं आहे. Maharashtra Weather Report

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

राज्याच्या हवामानात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 11 ते 13 जून दरम्यान हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. विशेषतः 13 जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार असून, 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काही भागात मुसळधार सरी पडू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पश्चिम महाराष्ट्राची मुसळधार सरींची शक्यता

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 10 जून पासून पावसाची चाहूल लागणार आहे. 13 जूनला मुसळधार पावसाचा वाऱ्यांचे वेग 50- 60 किमी प्रति तास होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः गट माथ्यांवर पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असा इशाराही देण्यात आलेला आहे

मराठवाड्यात वाऱ्यांचा धोका, पिकांची काळजी घ्या

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये 11 ते 13 जून दरम्यान वादळी वार्‍यांचा इशारा देण्यात आलेला आहे. 13 जूनला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर वाऱ्यांचा वेग 50 किमी प्रति तासाच्या आसपास असण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची तसेच साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यांची शक्यता

भारतीय हवामान खात्याने अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसांच्या सरी सह वादळी वाऱ्यांचा प्रचंड जोर जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेषता ११ जून रोजी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वाळ्यांचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी झाडाखाली थांबणे, लोंबत्या विज तारांपासून दूर राहणे आणि हलक्या धातूच्या छपराजवळ जाण टाळावं असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांनो या भागात मान्सून आला, या तारखेला होतोय दाखल, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!