महाराष्ट्र बातमी : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा काय? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Batami : पुन्हा एकदा नागरिकांचे टेन्शन वाढणार आहे. अवकाळी पावसाचे संकट संपले आणि पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसात तापमान दोन ते तीन अंशने वाढवण्याची शक्यता वर वर्तवली आहे. वाढत्या उष्णता मुळे नागरिकांचे पुन्हा एकदा हाल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये डोके दुखणे, चक्कर येणे रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवताना पाहिले मिळत आहे.Maharashtra Weather Batami

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका चांगलाच वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे, आणि योग्य ते काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस तापमानात पुन्हा वाढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई सोबत ठाण्यामध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. राज्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात विदर्भात उंच अंक तापमानाचे नोंद करण्यात आलेले आहे.

विदर्भात तापमान वाढले?

गेला काही दिवसांपासून राज्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. कधी अचानक अवकाळी पाऊस तर कधी अचानक उष्णतेच्या लाटेचा इशारा. राज्यातील अनेक भागासह विदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी मध्ये 43.8 अमरावती आणि चंद्रपूर मध्ये 43.6 तर नागपूर मध्ये 42.4 वाशिम 42.2 वर्धा 42.4 यवतमाळ 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने राज्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे दुपारी गरजे शिवाय बाहेर पडू नये आरोग्य विभागाने म्हटले आहे. वाढता उष्णतेमुळे राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्ण गाता करिता विशेष कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!