Maharashtra Rain Forecast: राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाकडून अतिशय महत्त्वाचे अलर्ट जारी करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून शांत असलेला मान्सूनचा आता पुन्हा कमबॅक होत असल्याचे संकेत दिसत आहेत. हवामान विभागाच्या तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार आगामी 72 तासात म्हणजेच 13 ते 16 जून दरम्यान राज्यात मान्सून जोरात बरसणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोकण परिसरात अतिवृष्टीचा धोका असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून लवकर राज्यात दाखल झाल्याचे दिसले. मात्र 26 मे पासून राज्यात मान्सून काही प्रमाणात अडखळल्याचा दिसला. यामध्ये मुंबई पुणे आणि आसपासच्या भागात काही प्रमाणात पाऊस झाला. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलीच विश्रांती घेतल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामासाठी तयार केलेले नियोजन काही प्रमाणात विस्कळले. विदर्भात तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते मात्र 13 जून पासून हवामानात मोठा बदल होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. Maharashtra Rain Forecast
हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..
राज्य सरकार आणि हवामान खात्याच्या निरीक्षणा नुसार देशातही मान्सून जोरात सक्रिय होत आहे. कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तसेच झारखंड अंदमान निकोबार बेट मध्य प्रदेश केरळ कर्नाटक आणि लक्षद्वीप मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि सतत पडणारा पाऊस होताना दिसत आहे. विशेष म्हणजे 12 जून पासून वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 70 किलोमीटर पर्यंत वाढणार असून, राज्यात वादळी वाऱ्यासोबत जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळी पावसात राज्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
कोणती काळजी घेणे गरजेचे?
सध्या राज्यात वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याचा अंदाज आहे. राज्यात भाग बदलत होणाऱ्या पावसासोबत वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःची आवश्यकती काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये वादळीवाऱ्याच्या पावसामध्ये कोणत्याही झाडाखाली आसरा घेणे टाळावे. त्याचबरोबर मजबूत इमारतीमध्ये थांबावे. जनावरांना झाडाखाली बांधणे टाळावे. कारण वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याची किंवा लाईटीचे खांबे कोसळण्याची शक्यता वर्तवणे जात आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी झाडाचा किंवा इतर अमजबूत ठिकाणाचा सहारा न घेता मजबूत ठिकाणी निवारास शोधावा.
हे पण वाचा| शेतकऱ्यांना पिक विम्याचा शेवटचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची अपडेट समोर..
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे कोणते?
हवामान विभागाने ज्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिले आहे त्यांची दोन पातळ्यावर विभागणी करण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिवृष्टीची शक्यता असून त्या ठिकाणी प्रशासन आणि नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्ट असलेल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये रायगड (14 जून), रत्नागिरी (11 ते 13 जून), सिंधुदुर्ग (12 ते 14 जून), पुणे (12 जुन), घाटमाथा व शहर, कोल्हापूर व घाटमाथा (12 ते 14 जून), सातारा घाटमाथा (13 ते 14 जून), आणि सांगली (12 ते 13 जून), या जिल्ह्यांचा समावेश आहे.
येलो अलर्ट असलेले जिल्हे कोणती?
ज्याप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे त्याचप्रमाणे येलो अलर्ट देखील दिला आहे. यामध्ये पालघर (14 जून), ठाणे (12 ते 14), जून मुंबई (13 ते 14 जून), सोलापूर (11 ते 13 जून) छत्रपती संभाजी नगर (11 ते 14 जून) जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव (11 ते 14 जून) तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर आणि (वर्धा 12 ते 14 जून) या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? जाणून घ्या तारीख सोबत यादी…”