Maharashtra Rain Forecast : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मान्सून पूर्व हवामानाचा परिणाम जाणू लागलेला आहे आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची बातमी आपल्या कानावर आली. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतातील कामांना लगबग सुरू केलेले आहे. परंतु एक गोष्ट सांगू राज्यात अवकाळी पावसाने दुमाकूळ घातलेला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि आता शेतकऱ्यांना सावध राहण्याची गरज आहे. Maharashtra Rain Forecast
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तर काहीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढण्याची ही शक्यता असून मच्छीमारांना समुद्र न जाण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
मान्सून पूर्व पाऊस: संधी की संकट?
आता तुमच्यासमोर एक प्रश्न उपस्थित राहिला असेल, हा पाऊस संधी आहे की संकट तर याचे एक उत्तर आहे संधी कारण मशागत करण्यासाठी जमिनीत ओल निर्माण होते. मात्र सध्या जास्तच पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी टाईमच मिळत नाही. अचानक मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस पडत आहे. या हवामान खात्याच्या इशारा नंतर जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली असून, शेतकऱ्यांनाही हवामान खात्याचा अंदाज बघून शेतीचा कमी करण्याचे आवाहन करण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | Rain Alert : राज्यावरती मोठ संकट! होणार मुसळधार पाऊस शेतकऱ्यांनो सावधान