Maharashtra rain alert :राज्यात शेवटी मानसूने दमदार एंट्री घेतली आहे. आणि आता पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आकाशात काळे ढग जमलेत, आणि पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांचे मन प्रसन्न झालेला आहे. पण त्याचवेळी हवामान विभागाने म्हणजे आज 6 जून रोजी 15 पेक्षा अधिक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने, हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सोबत विजांचा तांडव आणि वाऱ्याचा जोर अशा स्थितीत नागरिकांनी सतर्क राहावं, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. Maharashtra rain alert
कोकणात पावसाची दमदार हजेरी; मुंबईत सावध रहा
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण असून, तशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि ठाणे तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नीचांकी भागात पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमी वरती सातारा आणि पुण्यात पावसाचा जोर अधिक राहील, तर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये वाऱ्यचा वेग अधिक असल्यामुळे उघड्यावर असलेल्या शेतमालाची आवश्यक घ्या.
तसेच नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे जळगाव धुळे नंदुरबार मध्ये देखील हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. बीड, परभणी, जालना, हिंगोली, आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पाऊस पडण्याचा अंदाज वर्तनात आलेला आहे. शेतकरी बांधवांनी या पार्श्वभूमीवरती शेतीसाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. सोबतच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्या वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हे पण वाचा | राज्यातील या 30 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा