राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्‍यता, IMD ने या जिल्ह्यांना दिला अलर्ट  

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या झळांनी नागरिक अक्षरशः हैरण झाले असताना काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात पार्श्वभूमी वरती आयएमडीने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला असून काही भागात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मात्र तापमान उष्णतेच्या कडी लोटावर पोहोचल्यामुळे नागरिकांना उन्हाचां झळांचा सामना करावा लागत आहे. तेलंगणापासून तमिळनाडू पर्यंत दक्षिण उत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाची काहीली अजूनही कायम आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये सध्या तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागांमध्ये गारपीटीचा अनुभव नागरिकांना आलेला आहे. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत.Maharashtra Rain Alert

विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.  यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना ही प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तर मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागांमध्ये तापमान पुन्हा 42 ते 44° c दरम्यान जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे हवामान विभागाने  येलो अलर्ट  जारी केलेला आहे. त्यामुळे हवामानातील याबद्दल त्या परिस्थितीकडे नागरिकांनी सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

बीड जिल्ह्यात परिस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे. गेल्या सात दिवसांपासून बीडमध्ये तापमानाचा पारा सातत्याने 43° c पुढे असल्याने नागरिक अक्षर सहा उष्णतेने थकले होते. दुपारच्या सुमारास रस्त्यावर सुखसुकाट पसरलेला दिसत होता. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रचंड टंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे अंगाची लाहीलाही करणारी उन्हाची लाट नागरिकांच्या जीवावरती घोर लावत होती. मात्र कडाक्याच्या उन्हात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने जोरदार सरीने नागरिकांना मोठा दिलासा दिला. केज तालुक्यात आलेल्या वादळी पावसाने अर्धा तास वातावरणात मोठा बदल केला. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे तापमानात लक्षणे घट झाली असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही श्वास घेता आला आहे.

पण या वादळी पावसाचा फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बसला आहे. आंबा, ज्वारी आणि बाजरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी आंब्याचे झाड व फळे जमिनीवरती सडलेले पाहायला मिळत आहेत. विशेषता यंदा आंब्याचे उत्पादन उत्तम झाले होते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षांनी आंबा विक्रीसाठी तयारी सुरू केली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि वाऱ्याच्या झटपटीने आंब्याचे बागांचे अक्षरशः नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाचे आरती कारणी कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्वारी, बाजरी सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवे संकट उभे राहिले आहे.

एकीकडे वादळी पावसाने दिलासा दिला असला तरी दुसरीकडे उष्णतेची लाट अद्याप अनेक भागात कायम आहे त्यामुळे राज्यात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनेकडे काटकरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानी बाबत तातडीने शासकीय यंत्रणे कडे संपर्क साधावा आणि योग्य ती मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया सुरू कराव्यात. राज्याच्या अनेक भागात हवामानात होणाऱ्या या सततच्या बदल्यामुळे येता काही दिवसात अजूनही अनेक घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

1 thought on “राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्‍यता, IMD ने या जिल्ह्यांना दिला अलर्ट  ”

Leave a Comment

error: Content is protected !!