भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे तसेच भारतीय हवामान खात्याने देशभरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे चांगले टेन्शन वाढलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये उष्णता कायम, तर हळूहळू नागरिकांना आता उन्हाचा चटका देखील बसू लागले आहे, उन्हाचा पारा सातत्याने वाढत चालला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येथे काही दिवसात उन्हाचा तडाका कायम राहणार आहे. यामुळे नागरिकांना काही विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे.Maharashtra Rain Alert

भारती हवामान खात्याचा अंदाज!

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले असून, अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जर पावसाळ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे या हवामान बदलाचा परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांवरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यामध्ये 23 आणि 24 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे आणि शुष्क राहील. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे.

उष्णता कायम! महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

राज्यामध्ये सध्या उन्हाचा पारा वाढत आहे पुढील काही दिवसांपासून तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्रात मात्र तापमानात चढउतार दिसून येईल. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान 1-2 अंतर्गत अंशांनी घटेल, त्यानंतर ते दोन ते तीन अंशाने वाढेल विदर्भामध्ये तापमानात फारसा बदल होणार नाही.

हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा

मुंबईमध्ये तीव्र उष्णता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. 21 फेब्रुवारी रोजी सांताक्रुज येथे तापमान 37.3°C पर्यंत पोहोचले आहे, ची सरासरी 4.3 अंशानी जास्त होते. पुढील दोन दिवस मुंबईमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर किंचित घट होऊ शकते.

सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाका वाढत आहे. उत्तर भारतातील वादळी पावसाचा परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर होऊ शकतो. तसेच मुंबई सह कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी सतत आमच्या वेबसाईटला भेट देत रहा खात्याच्या सूचना कडे लक्ष देण्याची गरज आहे.

14 thoughts on “भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!”

Leave a Comment

error: Content is protected !!