Maharashtra IMD NEWS | खरे तर गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. राज्यात सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस पुढे गेलेले आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उन्हामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच IMD ने एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.Maharashtra IMD NEWS
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाची चटके बसत आहेत. तर दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाच्या झळा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. राज्यात भूषण दिवस वातावरणात बदल होत आहे भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाज मध्ये जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
रबी हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. गहू हरभरा या पिकांचे हार्वेस्टिंग सुरू आहे. अशातच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जाऊ लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर अवकाळी पाऊस पडल्यास गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ज्वारी, या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तमान येत आहे. अशाच प्रकारचे हवामान बदल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाही अशीच परिस्थिती होणार का त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
राज्याचा अवकाळी पावसाची शक्यता !
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या या अंदाजानुसार, बुधवारपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा हवामान अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे.
तर महाराष्ट्रामध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान 42° पोहोचल्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. कोणाच्या तीव्रते सोबत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी शेती संबंधित योगी नियोजन करून आपल्या होणाऱ्या नुकसान वाचवता येणार आहे. तर ताजा हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा!
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!