Maharashtra Hawamaan Andaaz | भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज आलेला असून, हवामानात मोठा बदल झाला असल्याचे म्हटले आहे. तर हवामानात लक्षणीय बदल झालेला आहे, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषता: मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मुंबई परिसरात तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, त्याच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात आणखी दोन ते तीन अंशाने वाढ होणार आहे. या पार्श्वभूमी वरती अकोला, चंद्रपूर, कोकणपट्टी आणि मुंबई परिसरात उष्णतेच्या(Heat wave warning)लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. Maharashtra Hawamaan Andaaz
या ठिकाणी वादळीवाऱ्याचा इशारा!
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, मराठवाड्यात 14 ते 20 मार्च दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे. म्हणजे या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह हलक्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे अचानक प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शेतांच्या पिकांवरती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामान तज्ञांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्यातील हवामान झालेला बदल पाहता परिस्थितीचा विचार करता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कृषी सल्ले दिलेले आहेत. या सल्ल्यांचे पालन केल्यास शेती आणि पिकांचे संभाव्य होणारे नुकसान टाळता येऊ शकते, यामुळे कोणते सल्ले दिलेले आहे ते जाणून घ्या.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सल्ले
सध्या राज्यामध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभारा पिके काढण्यास तयार झाल्यास त्वरित हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. शेतमालाला योग्य प्रकारे वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे जेणेकरून उष्णतेपासून नुकसान होणार नाही, आणि नुकसान टाळता येऊ शकते. गव्हाच्या पिकात उंदराचा प्रभाव दिसल्यास झिंक फॉस्फईड, गुळ, गव्हाचा भरडा थोडेसे गोड तेल यांचे मिश्रण तयार करून उंदराचे बिळामध्ये टाकून बंद करता येऊ शकतात. वाढत्या तापमानामुळे आणि कोरडे हवामानाचा पार्श्वभूमी वरती मका पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देणे आवश्यक आहे.
तसेच वाढत्या तापमानामुळे बागायती शेतीला योग्य ते पाणी देणे व त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी फळझाडांच्या आल्यात अच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या केळी रोपांना सावली देणे आवश्यक आहे. जेणेकरून ते उन्हाच्या तीव्रते पासून सुरक्षित राहतील. आंबा झाडांसाठी नियमित पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तर नवीन लागवड केलेल्या झाडांना सावली व्यवस्था करावी जेणेकरून ते उन्हाळ्यामुळे खराब होणार नाही.
राज्यातील हवामान परिस्थितीचा शेतकऱ्यांनी आढावा घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्या पिकांना कोणतीही हानी होणार नाही. तसेच वादळी वाऱ्यासह आणि अवकाळी पाऊस काही वेळा भागात नुकसान करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्यवेळी खबाबदारी घेऊन पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अशाच हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.