Maharashtra Forecast : राज्यात खरंतर पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या पार्श्वभूमी वरती सर्वात जास्त धावपळी शेतकऱ्यांचे होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी पेरणीपूर्वी मशागत करणे गरजेचे आहे परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास विलंब होत आहे. सध्या रानात पाणी साचला आहे यामुळे वापस होत नाही आणि शेतकऱ्यांना शेतीत कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही. Maharashtra Forecast
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात अनेक दिवसापासून पावसाचे आगमन आहे. परंतु दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. राज्यामध्ये चांगला पाऊस पडला आहे. तर आता अशातच भारतीय हवामान खाते महाराष्ट्रात मान्सून ने एन्ट्री घेतल्याचे म्हटल आहे. तसेच, राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
पुणे वेधशाळेने बुधवारी अधिकृत घोषणा करत सांगितले की, मान्सून विदर्भात दाखल झालाय आणि तो थेट गडचिरोली पर्यंत पोहोचलाय. मात्र त्याआधी मानसून ने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. नागपूर मध्ये बुधवारी संध्याकाळी आलेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळी, विजांच्या तारा तुटल्या आणि शहरात काही काळ भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे नागपूरकरांना मोठी धावपळ करावी लागली.
या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
भारतीय हवामान खाते ना ऑरेंज अलर्ट जारी करत, राज्यातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना औरंगाबाद जाहीर केला आहे तर या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असे देखील परिस्थिती उपस्थित झालेला आहे.
सांगायचं झालं, तर पावसाचे आगमनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचित्य पसरला आहे. बियाणे तयार ठेवलंय, बैल जोड्या तयार आहेत आणि सगळीकडे पुन्हा एकदा शिवारात जीव ओतायाची याची लगबग सुरू झालेली आहे. पण विजा आणि अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने लोक अजून घरा बाहेर पडायला घाबरत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोवा भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
हे पण वाचा | यंदा राज्यात मान्सून लवकर का? दाखल झाला, हवामान तज्ञ काय म्हणतात पहा
1 thought on “मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, या सहा जिल्ह्यांना मोठा इशारा”