Maharashtra Cabinet Decision 2025 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ऐतिहासिक निर्णय, सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी!

Maharashtra Cabinet Decision 2025 | राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, मच्छीमार व गरजू घटकांना थेट फायदा होईल, धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले. एकूण आठ विभागा संबंधित या निर्णयाने राज्यातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. Maharashtra Cabinet Decision 2025

ग्रामविकास विभाग – सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र

सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, महिला प्रशिक्षण केंद्राची ही स्थापना केली जाणार आहे. स्मारकासाठी ₹142.60 कोटी रुपये, प्रशिक्षण केंद्रासाठी : ₹67.17 लाख या उपक्रमामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चलना मिळणार आहे.

जलसंपदा विभाग – गोशीखुर्द धरण प्रकल्पाला सुधारित मंजूरी

भंडारा जिल्ह्यातील गोशी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी ₹25,972.69 कोटीच्या सुधारित प्रकाशकीय मंजुरीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षमता वाढून शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे.

महसूल विभाग – विधी अधिकाऱ्यांचे मानधन वाढवले

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय कंत्राटी विधी अधिकाऱ्यांचे मानधन आता ₹35,000 ऐवजी ₹50,000 करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कायदेशीर सेवा अधिक सक्षम होईल.

विधी व न्याय विभाग न्यायालयांना मुदतवाढ

14 व्या वित्त आयोगांतर्गत स्थापना झालेल्या 16 अतिरिक्त न्यायालयाने आणि त्याल जलद गती न्यायालयांना आणखी दोन वर्षाची मुदत वाढ न्यायदान प्रक्रियेतील विलंबट टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय.

मत्स्य व्यवसाय विभाग कृषी प्रमाणेच दर्जा, सवलती

मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्र सरकार दर्जा देण्यात आलेला असून यामुळे मच्छीमारांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. पायाभूत सुविधांसाठी सवलती, वित्तीय सहाय्य मिळण्याची संधी

गृहनिर्माण विभाग झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात सुधारणा

पायाभूत सुविधांमुळे बाधित झालेल्या झोपडपट्ट्यातील नागरिकांसाठी पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यात आली आहे या अंतर्गत घराचे निर्मिती वितरण अधिक गतिमान होईल.

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्ह्यातील महामार्गाचा विकास

तळेगाव चाकण चार पदरी उन्नत मार्ग, चाकण शिक्रापूर सहा पदरी समांतर रस्ता या रस्त्यांमुळे वाहतुकीचा बोजा कमी होईल आणि औद्योगिक क्षेत्रांना चलना मिळेल.

राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळात सर्वसामान्यांचा विचार करून बहुपरिणामी निर्णय घेतले आहेत. महिलांचे सक्षमीकरण, न्यायालयाची सुविधा, जलसंपत्तीचा विकास, मच्छीमारांची कल्याण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन व महामार्ग विकास – हे सर्व निर्णय महाराष्ट्राच्या समतोल व सर्वांगीण विकासासाठी मौलाचा दगड ठरणार आहे.

हे पण वाचा | राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती

1 thought on “Maharashtra Cabinet Decision 2025 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ऐतिहासिक निर्णय, सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी!”

Leave a Comment

error: Content is protected !!