आता राज्यातील या लाडक्या बहिणींवर होणार कडक कारवाई? आली मोठी बातमी समोर!

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रात नुकतीच सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Mukhymantri Ladki Bahin Yojana) अनेक गरजू महिलांसाठी दिलासादायक ठरत असताना आता यामध्ये फसवणूक करणाऱ्यांविरोधात सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पात्र नसतानाही काही महिलांनी चुकीची माहिती देत योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आलं असून आता अशांवर थेट कारवाई होणार आहे. यामध्ये जर तुमचेही नाव असेल तर आधीच सावध व्हा आणि या योजनेमधून काढता पाय घ्या अन्यथा तुम्हालाही कारवाईला समोर जावे लागेल.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यामागचं कारण म्हणजे सरकारने इनकम टॅक्स विभागाच्या डेटाशी योजनेची नोंदणी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ज्या महिलांचा किंवा त्यांच्या पतीचा आयकर रिटर्न दाखल झालेला असेल, अशा कुणालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनानं योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. यामुळे खोटं बोलून फायदा घेणाऱ्यांवर जरब बसेल आणि खरंच गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे या योजनेत पारदक्षता येणार आहे. Ladki Bahin Yojana Update

या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही भागांतून फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या. कुणी उत्पन्न लपवून अर्ज केला, तर कुणी सरकारी नोकरी असूनही स्वतःला बेरोजगार दाखवलं. यामुळे ज्या खऱ्या गरजूंनी प्रामाणिकपणे अर्ज केला त्यांच्यावर अन्याय होऊ लागला. हे लक्षात घेत राज्य सरकारने आता थेट आयकर खात्याच्या डेटाबेसशी सगळी माहिती जोडून प्रत्येक अर्जदाराची छाननी करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांनाच योजना मिळणार असून, खोटं सांगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सरकारने स्पष्ट केलंय की, ‘लाडकी बहीण योजना’(ladki Bahin Yojana) फक्त त्या महिलांसाठी आहे ज्या खरोखर गरजू आहेत. यात २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा एकल महिलांचा समावेश आहे. अर्ज करणाऱ्या महिलांचं संपूर्ण उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावं आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसेल किंवा आयकर भरणारा नसेल. जर हे निकष पूर्ण होत नसतील, तर अर्ज फेटाळला जाणार आहे.

या योजनेत दरमहिन्याला थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. यासाठी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीचा वापर केला जातो. मात्र, जर लाभार्थी चुकीचा असेल तर सरकारी पैसा वाया जातो. म्हणूनच आता हे सगळं पूर्णपणे डिजिटल पडताळणीद्वारे होणार आहे. यामुळे या योजनेची विश्वासार्हता वाढेल आणि गरजूंना वेळेवर मदत मिळेल.

शासनाच्या या निर्णयामुळे ‘लाडकी बहीण योजना’ अधिक पारदर्शक होणार असून, गरजूंना न्याय मिळणार आहे. फसवणूक करणाऱ्यांना बाजूला काढून अशा योजनांचा खरा उद्देश पूर्ण करणे हीच शासनाची भूमिका असून, भविष्यातही अशा धोरणांमधून गरिबांना बळ मिळेल, असा विश्वास राज्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

(Disclaimer: वर दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे, याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या घोषणाकडे वाट पहा)

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana: या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातला हप्ता! काय आहे कारण जाणून घ्या

Leave a Comment

error: Content is protected !!