लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana Update : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झालेली आहे. यामध्ये, विशेष ज्या महिला कडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची मदत परत घेतली जाऊ शकते अशी चर्चा रंगू लागलेली आहे. याबाबत बोलत असताना महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. Ladki Bahin Yojana Update

चार चाकी गाडी असलेल्या महिलांना मदतीची गरज आहे का?

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, ही योजना गरीब महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे. त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या 1500 रुपयांची खरच गरज आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. चार चाकी वाहनधारक लाभार्थ्यांना 10,000 रुपये इंधन खर्च येतो, अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांनी ₹1500 रुपयांसाठी अर्ज का करावा हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे.

हे पण वाचा | पिक विमा म्हणजे काय? पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पहा पूर्ण माहिती

निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी

महिला व बालकल्याण विभागाने आता योजनेसाठी निर्धारित निकष न पाळणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केलेली आहे. यामध्ये, ज्या महिलांच्या नावे वरती चार चाकी वाहने आहेत, अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येणार असून त्यांना दिलेली मदत परत द्यावी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अंगणवाडी सेविका मार्फत घराघरांमध्ये जाऊन लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतात निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांकडून मदत वापस घेतली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे.

लडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची वाढती संख्या

राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे अडीच कोटी पर्यंत पोहोचलेली आहे. जानेवारी महिन्यात सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आतापर्यंत एकूण महिलांच्या खात्यावरती सात हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे, 10,500 रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत.

सरकारने स्पष्टता आणण्याची गरज

छगन भुजबळ यांच्या मते, शासनाने योजनेसंदर्भातील नियम अधिक स्पष्ट म्हणले पाहिजे, अनेक महिलांना या योजनेसाठी बद्दल अर्धवट माहिती असल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे. सरकारने टीव्ही, वृत्तपत्रे आणि इतर समाज माध्यमातून योजनेचे नियम संपूर्णपणे जाहीर केल्यास, अपात्र महिला स्वतःच्या मर्जीने योजना सोडतील आणि पात्र महिलांना अधिक पारदर्शक पद्धतीने लाभ मिळेल.

निष्कर्ष

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. मात्र, ज्या महिलांनी अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची चौकशी सुरू झालेली असून त्यांना दिलेली मदत परत घेतली जाण्याची शक्यता प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. सरकारने योजनेच्या अटी अधिक स्पष्टपणे लोकांसमोर आणाव्या जेणेकरून केवळ गरजू महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळू शकेल. आता या योजनेमधून किती महिला अपात्र ठरणार आहेत याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.

(अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा)

error: Content is protected !!