Ladki Bahin Yojana News | लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज समोर आलेली आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर ते जमा होणार आहे. हा हप्ता कधी जमा होणार व महिलांना पंधराशे रुपये मिळणार की 2100 ? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana News
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे. सकारात्मक चर्चा म्हणजे महिलांना लवकरच ₹2100 रुपये मिळणार व नकारात्मक चर्चा म्हणजे सरकारकडे आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना बंद होणार. परंतु, याबाबत बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, परंतु यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यामुळे गरजू व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने जर काही मोठा निर्णय घेतला तरी या योजनेमधून अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील महिलांना आतापर्यंत 13500 मिळाले आहेत. परंतु पुढील हपत्याबाबत एक मोठी अपडेट हाती आलेली आहे. खरंतर, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा लाभ मार्च महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे.
राज्य शासनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यावरती दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एक सोबत जमा केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येऊ शकतो याबाबत एक नवीन माहिती समोर येत आहे.
लाडक्या बहिणींना लाभ कधी मिळणार?
राज्य शासनाने आठ मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या खात्यावरती मार्च व फेब्रुवारी महिन्याचे पैसे एक सोबत महिलांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. यामुळे महिला दिनानिमित्त महिलांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे.
दरम्यान आता प्रश्न उपस्थित असा राहतो की, एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होणार? प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचे पैसे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यावरती जमा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोणत्या तारखेला महिलांना पैसे मिळणाऱ्या कडे पाहण्यासारखे राहणार आहे. तर काही महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही अशी एक अपडेट हाती येत आहे.
अनेक महिलांचे नावे या योजनेमधून बाद करण्यात आलेली आहे. त्या महिला कडून पैसे परत घेतले जाणार नाही अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच राज्यात 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख महिला अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून येणारा लाभ बंद झालेला आहे. आता आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र