Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. महायुती सरकारने या योजनेच्या वाढीव आर्थिक मदती बाबत मोठे आश्वासन दिलेले होते. परंतु सरकारने अद्याप कोणताही याबाबत निर्णय घेतलेला नाही. तसेच समाज माध्यमांमध्ये ही योजना बंद होणार असल्याचे अफवा पसरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. Ladki Bahin Yojana News
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असणाऱ्या अफेवरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. आणि वाढीव रक्कम ही लवकर मिळणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील जुनी भांडी करणाऱ्या 20 महिलांनी रशिकाश्रय संस्थेच्या जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी, उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतलेली आहे. या महिलांनी आपल्या अडचणी मांडलेल्या आहेत. यापैकी एका वृद्ध महिलेने “भांडी घासून मिळणाऱ्या पाचशे रुपयात कुटुंब कसे चालवायचं? पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला आधार दिलेला आहे. हे ऐकून मुख्यमंत्री भावनिक झाले आणि प्रतिक्रिया दिली.
हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. “महिलांना दरवर्षी दहा हजार रुपयांचा सन्मान निधीची मागणी केलेली असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीचा विचार करण्याच्या आश्वासन दिले आहे.
लडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना ठरली आहे याचा उद्दिष्ट राज्यातील गरीब महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे व त्यांना प्रोत्साहन देणे त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णयात भूमिकेला बळकटी देणे हा मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये आर्थिक मदत प्रति महिना त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे.
या योजनेच अर्ज प्रक्रियेसाठी काही निकष आणि आवश्यक कागदपत्रे आहेत. या योजनेमध्ये अर्ज घेण्यासाठी हजार महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच महिलेच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. महिलांना दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत सरकारकडे अडीच कोटी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 2.4, कोटी अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे, लाडकी वन योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे व अशा अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे. योजना सुरू राहणार असून, महिलांना अधिक मदत कशी करता येईल यावर सरकार विचार करत आहेत.
बातमी स्त्रोत : प्रसार माध्यम