Breaking news : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळा! 20 ते 25 जण वाहून गेले असल्याची शक्यता!

Indrayani bridge collapsed : पुणे जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आज रविवारी एक मोठी दुर्घटना घडलेली आहे मावळ तालुक्यातील एक पर्यटन स्थळी मोठी गर्दी जमली असताना ही घडली असल्याची म्हटले जात आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडमाळा परिसरात इंद्रायणी नदीवरचा पूल अचानक कोसळल्यामुळे मोठा अनर्थ झाला आहे. या घटनेने सुमारे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा स्पष्ट झालेला आहे. Indrayani bridge collapsed

नेमकं काय घडलंय?

मावळ तालुक्यातील कुंडमळा हे ठिकाण पावसाळ्यात पर्यटकांसाठी लोकप्रिय गतव्य ठरत आहे. याच ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल बांधलेला होता. आज दुपारी अचानक फुल कोसळला, आणि त्याच वेळी त्यावरून अनेक पर्यटक नदी ओलांडत होते. अचानक घडलेल्या घटनेने घबराट पसरली आणि काही क्षणात काहीजण नदीच्या पाण्यात वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, NDRF, स्थानिक प्रशासना आणि तळेगाव नगर परिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रुग्णवाहिका, बचाव तज्ञ, तसेच गोताखोर युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत आहे. नदीत अडकले आहेत त्यांना वाचवण्यासाठी ड्रोन व बोटीने साह्य केले जात असल्याचं समोर आले आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो – आमदार सुनील शेळके

प्रसार माध्यमांशी बोलत असताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि आतापर्यंत सहा मृतदेह हाती लागल्या असून, वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून नागरिकांना कुंडमळा परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे नदीला पूर परिस्थिती आली असून, फुलांचे स्ट्रक्चर ही कमजोर झाल्याची शक्‍यता आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटना क्रमाची माहिती घेतली असून, बचाव कार्यास गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!