IMD Monsoon Update : राज्यात पावसाने (Monsoon 2025) लवकरच इंट्री घेतलेली आहे. परंतु आता त्याला ब्रेक लागलेला आहे. यंदा मान्सून वेळे आधी म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्र मध्ये दाखल झाला अनेक भागात मुसळधार पाऊस देखील पडला. लातूर सह कोल्हापूरपर्यंत, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातल्या काही गावात शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. आभाळ भरून येणे, पावसाच्या सरी, आणि मातेतून येणारा गंध सगळीकडे नवा आशावाद पसरलेला दिसतोय. IMD Monsoon Update
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु या आनंदा वरती थोडा विसर पडणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने ब्रेक घेतला आहे आणि हवामान खात्याचा नवीन अंदाज शेतकऱ्यांसाठी चिंता घेऊन आलेला आहे. पुण्याच्या हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच ते सात दिवस म्हणजे दहा ते बारा जून पर्यंत राज्यात पावसाची उघड असल्याचं म्हटले आहे
हवामान तज्ञांचा काय म्हणणं ? What do weather experts say?
हवामान तज्ञ S.D सानप यांचे म्हणणं आहे की, मान्सूनचे वारे थोडे कमी झाले आहेत आणि त्यामुळे लगेच मोठ्या प्रमाणावरती पेरण्या करू नये. शेतकऱ्यांनी यंदा जरा विचारपूर्वक पावसाच्या पेरण्या करण्याकडे लक्ष ठेवावे कारण सुरुवातीचा जोश फार वेळ टिकत नाही असं आहे.
पेरणी म्हणजे शेतकऱ्याचे जीवाचं काम. एकदा बी पेरलं की त्यावर त्याचा पुढचा सगळा भविष्य उभ राहते. त्यामुळे एकही पाऊस चुकला, तर महिन्याभराचं कष्ट पाण्यामध्ये जाते. म्हणूनच हवामान खातेने दिलेल्या इशाराकडे महत्त्वाचं लक्ष द्या. हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, यांना मान्सून देशात 108 टक्क्यांपर्यंत चांगलं पडेल असा अंदाज आहे. म्हणजे पावसाची मात्र जास्त शक्यता आहे पण त्याच्या वेळा आणि खंड हे समजून घेण्यात इतकंच महत्त्वाचा आहे.
यंदा राज्यामध्ये पावसाची सुरत दमदार झाली आहे, पण नंतर अचानक थोडी शांतता पसरली. सुशांतता चुकीच्या वेळी आली, असं म्हणता येणार नाही, पण शेतकरी बांधवांनी या वेळेचा वापर मशागत, नांगरणी, खतांची तयारी आणि बीज साठवणुकीसाठी करायला हवा.
शेतकरी बांधवांनो 12 जून पासून पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे तोपर्यंत धीरधारा आणि पेरणी करण्यास घाई करू नका अशा आव्हान हवामान तज्ञांनी केलेला आहे.
हे पण वाचा | Rain Alert : राज्यात होणार मुसळधार! या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा!