IMD Monsoon Update  : राज्यातील पुढील 48 तास महत्त्वाचे ! हवामान खात्याचा नवीन अंदाज जारी

IMD Monsoon Update : सध्या राज्यात मान्सूनी आपला जोर दाखवायला सुरू केलेला असं हवामान विभागाकडून देखील एका मागून एक मोठे इशारा दिले जात आहेत. परंतु सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील रानातील कामे करण्यास वेळ मिळाला आहे. परंतु शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कामे पूर्ण करून घ्या भारतीय हवामान खातेने देखील एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे यामुळे तुम्हाला शेतातील कामे करण्यास वेळ देखील मिळणार नाही.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला असून केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पावसाचा दोर अधिक वाढला आहे. काही ठिकाणी घरात पाणी घुसल्यामुळे मालमत्तेचा मोठा नुकसान झालंय. आणि आता या सगळ्यांवर आणखी एक संकट गडद होऊ लागला आहे. बंगालच्या उपसागरातून पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढील 48 तासात महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. IMD Monsoon Update

हवामान विभागाच्या ताज्या अपडेट नुसार, हा कमी दाबाचा पट्टा पुढील 36 ते 48 तासांमध्ये आणखी तीव्र होणार आहे आणि त्यानंतर उत्तरेकडे सरकण्याची सुरुवात करेल. यामुळे समुद्र लगतच्या आणि केरळ कर्नाटक गोवा कोकण या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच दरम्यान वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता असून काही भागांमध्ये तो 60 किमी प्रति तास जाऊ शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्याला रेड अलर्ट

हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, कोकण किनारपट्टी आणि घाटमाट्या लगतच्या भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. तमिळनाडू, गोवा, कर्नाटक या राज्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. शेतकरी, मच्छीमार आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सावध राहावं, असंही सांगण्यात आलंय.

मान्सून अनुकूल वातावरण तयार

या हवामान बदल्यामुळे मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाला आहे. समुद्रसपाटीच्या उष्णतेमुळे तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता मान्सूनचा वेगवान आगमन आणि विस्तार यासाठी कारणीभूत ठरत आहे. ज्यामुळे केवळ दक्षिण भारतात नव्हे, तर पश्चिम आणि मध्य भारतातील लवकर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे एकीकडे शेतीसाठी हे वातावरण फायदेशीर असेल तर तितकच धोकादायकी ठरवू शकता.

तर शेतकरी बांधवांनी देखील हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि पुढील नियोजन करायचे आहे जेणेकरून त्यांना देखील याचा मोठा फायदा होऊ शकतो. यंदा मान्सून लवकर वेळेत आगमन झालेला आहे. पण जर तुम्ही योग्य नियोजन नाही केली तर याचा फटका देखील बसू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!