IMD Alert : राज्यामध्ये मृग नक्षत्र सुरुवात होऊन तब्बल आठवडा उलटला असला तरी अद्याप पावसाने कुठेही समाधानकारक हजेरी लावलेली नाहीत. आणि शेतकऱ्यांनी तर बियाणं लावून टाकला आहे. आता प्रश्न उरतो तो पाऊस कधी हजेरी लावणार आणि बळीराजा सुकवणार. शेतकरी हातात बी घेऊन आकाशाकडे डोळे लावून बसलेत. बरेच शेतकऱ्यांनी तर मे महिन्यातच बी लावून टाकला आहे पण आता पावसाची दांडी मारल्याने शेतकऱ्यांना मोठं टेन्शन आलं आहे आणि पीक येईल का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. IMD Alert
मान्सून परत सक्रिय झाला, पण…
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ S.d सानप यांनी सांगितलं की, मागील चार-पाच दिवसापासून मान्सून ने पुन्हा गती पकडली आहे. कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस झालेला आहे आणि विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी हलकासा पाऊस पडला आहे. पण हे प्रमाण आणि सातत्य अजूनही खरीप हंगामासाठी पुरेसे नाही, असं प्रत्यक्ष जमिनीवरच्या अनुभवातून पष्ट होते.
पुढच्या आठ दिवस कसे राहणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ञांनी पुढील आठवड्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कोकण आणि घाटमाथ्यावर पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यांचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला गेला. विदर्भात विजांच्या गडगडात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. पण हे प्रमाण इतकं ठरलेलं नाही की त्यावर भरोसा ठेवून सर्वत्र करण्यास सुरू करता येतील. त्यामुळे शेतकरी नियोजन येतील ओलावा आणि परिस्थिती लक्षात घेऊनच पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ञांचा मोठा इशारा
हवामान तज्ञ यांनी दिला महत्त्वाचा इशारा, शेतकऱ्यांनी आधी जमिनीत ओलावा आहे का, म्हणजे वापस आहे का हे नीट पहाव. एकदा बी टाकले की परत घेता येत नाही, आणि ओलवान नसता पेरणी केली तर बिया वाया जाईल, उगमाचं होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भावण्याच्या भरात नाही तर विचारपूर्वक निर्णय घ्या. कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्या. पाऊस आहे पण बे भरोशाचा आहे हे लक्षात ठेवा.
हवामान अंदाजRead this also : भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज