राज्यातील या नागरिकांना मिळणार ₹50 हजार रुपये? ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!, कोणाला मिळणार वाचा

GURUKUL ANUDAN NEWS : राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अधिक अनुदान मिळणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. GURUKUL ANUDAN NEWS

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना आर्थिक लाभ व त्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांना 50 हजार रुपयांच्या अतिरिक्त अनुदान मिळणार याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सविस्तर माहिती दिलेले आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या निर्णयाला मान्यता दिलेली आहे. आगामी बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील घरकुलांसाठी आता एकूण 2.10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

राज्य सरकार उचलणारा अतिरिक्त अनुदानाचा खर्च

या अनुदानाचा खर्च संपूर्ण राज्य सरकार उचलणार आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलेले आहे. धाराशिव येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी सांगितले की, वर्षभरामध्ये तब्बल 20 लाख घरकुलांची निर्मिती पूर्ण करण्याचा सरकारचे संकल्प आहे. त्यांच्या मते, प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे.

हे पण वाचा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय! नवीन GR समोर

10 लाख घरांसाठी पहिला हप्ता वितरित

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, या योजनेच्या या पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख घरकुलांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढील पंधरा दिवसात उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांना देखील हप्ता देऊन काम सुरू करण्यात येणार आहे.

100% मान्यता 45 दिवसात पूर्ण

महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी विशेष पाठपुरवठा केला होता. शंभर दिवसांचे नियोजनात पहिल्या 45 दिवसांमध्ये 100% घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे असे मंत्री गोरे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण भागातील विकासात मोठा वाटा

नक्कीच या योजनेचा मोठा वाटा ग्रामीण भागातील विकासासाठी होणार आहे. भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना घरी मिळणार आहे शहरी आणि ग्रामीण भागातील घरांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्थानिक निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड करून प्रकल्प मंजूर करण्याचे अधिकार दिल्या जातो. सरकारच्या या धोरणामुळे देशातील अनेक गरजू वगैरे कुटुंबांना त्यांच्या हक्काचे स्वतःचे घर मिळणार आहे. नक्कीच ही योजना गरीब कुटुंबांसाठी एक वरदान ठरणार आहे.

1 thought on “राज्यातील या नागरिकांना मिळणार ₹50 हजार रुपये? ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!, कोणाला मिळणार वाचा”

Leave a Comment

error: Content is protected !!