शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांच्या अडचणीवर मिळणार तात्काळ उपाय, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार..

Farmer News: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने सौर कृषी पंपाच्या तांत्रिक अडचणी आणि समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी एक नवीन विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. यामुळे सौर पंपाबाबत होणाऱ्या समस्या शेतकरी सोप्या पद्धतीने सोडू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत व नुकसान कमी होणार आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 5.65 लाख स्वर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. जे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहेत. येत्या काळात आणखीन पाच लाख नवीन सौर कृषी पंप बसवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यात आणि शेतीतील अधिक उत्पन्न घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र या सौर पंपाच्या वापरामुळे काही तांत्रिक अडचणी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सौर पंपाचे नुकसान होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू करून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

हे पण वाचा|महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…

समस्या निराकरणासाठी सोपे आणि मोफत सेवा

अनेक वेळा वादळी वाऱ्यामुळे किंवा मुसळधार पावसामुळे स्वर पंपाचे नुकसान होते. यात सौर पॅनल मध्ये बिघाड होण्याचे देखील प्रकार घडतात. पंप अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडतात अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पण आता या सर्व समस्यांचे तातडीने उपाय मिळणार आहेत. यासाठी महावितरण कंपनीने दोन टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. यामध्ये 18002333455 आणि 18002123435 यासोबतच एक विशेष पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. www.mahadiscom.in/solar_MTSKPY हे विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी आता घरबसल्या आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.

हे पण वाचा| व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली नव्या फीचरची एन्ट्री, बघा आता काय मिळणार नवीन फायदा..

ऑनलाइन आणि कॉल द्वारे तक्रार नोंदविता येणार

शेतकरी बांधव आपल्या मोबाईलच्या उपयोगाने टोल फ्री क्रमांक वर फोन करून किंवा पोर्टलच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने तक्रार सहजपणे नोंदवू शकतात. तक्रार नोंदवताना त्यांना आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लाभार्थी क्रमांक तसेच गाव तालुका आणि जिल्ह्याची माहिती देणे आवश्यक आहे. ही सोपी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या वेळ आणि श्रमचे बचत करणार आहे. या योजनेत एक अत्यंत महत्त्वाचे आणि अविश्वासक भाग म्हणजे प्रत्येक स्वर पंपाला विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या सौर पंपाला काही आर्थिक नुकसान झाले तर त्याची भरपाई किंवा दुरुस्ती त्वरित केली जाईल ही तरतूद शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार बनत आहे.

हे पण वाचा| जून महिन्याचा हप्ता लवकरच, महिलांच्या खात्यात होणार जमा आली मोठी अपडेट समोर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे महावितरण ने तक्रार नोंदवल्यानंतर केवळ तीन तासाच्या आत संबंधित पुरवठादार कंपनीने समस्या सोडवणे अनिवार्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलद गतीची सेवा मिळणार आहे आणि त्याचे काम खूप कमी वेळेत पूर्ण होणार आहे. तसेच महावितरणने सर्व पुरवठादार कंपन्यांना जिल्हा निहाय सेवा केंद्र स्थापन करण्याचे निर्दांस दिले आहेत. तक्रार सोडवल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज द्वारे सूचना देण्यात येणार आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल. Farmer News

MSEDCL अध्यक्ष आणि व्यवस्थापित संचालक लोकेश चंद्रा यांनी शेतकऱ्यांना या सेवेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या मन्यानुसार या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मनस्ताप वाचणार आहे. चोर पंपाची देखभाल दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा बसवण्यास अधिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा थेट परिणाम म्हणून शेती उत्पादनातही मोठा फायदा होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!